आशाताई बच्छाव
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबास चार लाख रुपये मदत
नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसामध्ये मोठे नुकसान झाले होते यामध्ये वीज पडून तळवाडे तालुका नांदगाव येथील इसम शांताराम सखाहरी निकम वय वर्ष साठ यांचा मृत्यू झाला तसेच दोन बैल मयत झाले होते.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सदर घटनेचा शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्ती ग्रस्तांसाठी तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात येत असते या अनुसार सदर मयत यांच्या वारस श्रीमती मंगलाबाई शांताराम निकम (पत्नी) यांना आज आज दिनांक 24 जून रोजी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या उपस्थितीत व सौ.अंजूमताई सुहास कांदे यांच्या हस्ते चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी नायब तहसीलदार चेतन कोनकर, अव्वल कारकून संतोष डुमरे,महसूल सहाय्यक धनराज बच्छाव, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे,प्रमोद भाबड, शहर प्रमुख सुनील जाधव, विद्या जगताप संगिता बागुल,रोहिणी मोरे, सागर हिरे,सदाम शेख आरीफ शेख भाऊराव बागुल,संजय आहेर हे उपस्थित होते.