राजेंद्र पाटील राऊत
जनता त्रस्त; तहसिल कार्यलय या चा कार्यभार मात्र मस्त
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख सह संग्रामपुर तालुका-विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे
संग्रामपूर :- तलाठी , मंडळ अधिकारी तहसीलदार पैसे घेतल्याशिवाय कामे करत नाहीत रयतक्रांतीचे जिल्हाअध्यक्ष नाना पाटील यांचा आरोप
ग्रामीण भागात प्रशासनाचा मुख्य कणा असलेला महसूल विभागाच्या योजनांची अंमलबजावणी तसेच शेत जमिनीशी संबंधित विविध नोंदी करणे, शेतकरी व विद्यार्थ्यांना लागणारी विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेला तलाठी मंडळअधिकारी , विशेष म्हणजे तालुक्याची सर्वेसर्वा असणारे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्यासह सर्व महसूल विभाग मस्त असून, जनता मात्र तलाठ्याच्या भेटीसाठी त्रस्त झाली . शिवाय खरीप हंगामासही सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांना सातबारा, होल्डींग, नमुना नं. ८ आदी कागदपत्रे लागतात. या कागदपत्रांसाठी तलाठी गावात येत नसल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण होते . या तलाठ्यांवर मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी ना जिल्हाधिकारी, कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पहावयास मिळते बहुतांश तलाठी हे मुख्यालयी न राहता शहराच्या ठिकाणी राहून कारभार करीत असल्याचे दिसून
आले. तलाठ्यांचा कारभार त्यांच्या अनधिकृत सहाय्यकावरच अवलंबून असल्याचे निदर्शनास आले. तालुक्यात शेतकऱ्यांचे होत असलेली पिळवणूक तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्या मनमानी कारभाराची व हे पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याबाबत ची तक्रार रयत क्रांती चे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपविभागीय अधिकारी देवकर मॅडम यांच्याकडे केली असून संग्रामपुर तालुका कडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे सदरच्या समस्या उद्भवत असल्याची खंत व्यक्त केली.
संग्रामपूर तालुक्यातील महसूल विभागाची कोणी चौकशी करून दोषींवर कारवाई होणार की..? पाणी कुठे मुरणारतर नाही ना..