राजेंद्र पाटील राऊत
अवैद्य वाळू उपसा थांबवण्यासाठी आमरण उपोषण
युवा मराठा आँनलाईन न्युज नेटवर्क (ब्युरो चीफ: शत्रुघ्न काकडे पाटील)
प्रतिनिधी :-परभणी(जिंतूर)
जिंतूर तालुक्यातील सावळी बु. येथील शासनमान्य वाळूच्या घाटावरुन बोट व जेसीबीच्या साहाय्याने हात असलेला बेकायदेशीर वाळूचा उपसा तात्काळ थांबवा. यासाठी रिपब्लीकन सेना शाखा जिंतूरच्या वतीने येथील तहसिल कार्यालयासमोर बुधवार १८ मे पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
शासनाने पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने घालुन दिलेल्या नियमांच्या अधीन राहुन वाळू उपसा करण्यास लिलावा द्वारे मान्यता दिली आहे. परंतु तालुक्यातील सावळी बु. येथील घाटातुन मात्र शासनाच्या सर्व नियमांना बगल देऊन कंत्राटदार बेसुमारपणे जेसीबी व बोटी च्या साहाय्याने वाळूचा उपसा करीत आहेत. ही शासनाची दिशाभुल असुन अशा प्रकारे होत असलेला. अवैध वाळूचा उपसा त्वरीत थांबवावा. प्रत्येक वाळुघाटावर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवावेत. रात्रीच्या वेळी करण्यात येत असणारी रेतीची वाहतुक व उपसा थांबवण्यात यावा. रेती उपसावर नियंत्रण ठेवण्याकडे दुर्लक्षित करत असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी असे रिपब्लीकन सेनेच्या वतीने सोमवार २ मे रोजी देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. परंतु तेंव्हा पासुन बुधवार १८ मे पर्यंत मागण्या पुर्ण न केल्याने उपोषणकर्ते रिपब्लीकन सेनेचे तालुकाध्यक्ष शरद चव्हाण यांनी तहसिल कार्यालयासमोर १८ मे पासून उपोषणाला सुरुवात केली आहे.