राजेंद्र पाटील राऊत
आता परिवर्तन अटळ..राजगडच्या निवडणूक छाननीत बाद ठरलेले अर्ज वैध!
राष्ट्रवादीला मोठा दिलासा.
भोर (जीवन सोनवणे युवा मराठा आँनलाईन न्युज नेटवर्क) : राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा दिला आहे. छाननी प्रक्रियेत बाद (अवैध) झालेले ९ अर्ज प्रादेशिक सहसंचालकांनी वैध ठरविले आहेत, त्यामुळे त्या नऊ जणांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
साखर आयुक्त कार्यालयात निवडणूकीच्या छाननप प्रक्रियेच्या विरोधातील पहिली सुनावणी मंगळवारी (ता. १० मे) पार पडली होती. यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसने आपली बाजू मांडली, तर गुरुवारी (ता.१२ मे) दुसऱ्या सुनावतीत कॉंग्रेस म्हणजे आमदार संग्राम थोपटे गटाकडून बाजू मांडण्यात आली. त्यानंतर मंगळवारी (ता.१७ मे) प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) दिलेल्या निर्णयामुळे आता १७ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
दरम्यान, बुधवारी (ता. १८ मे) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. साखर आयुक्तांनी दत्तात्रेय पांगारे व सुरेश खुटवड यांचे छाननी प्रक्रियेतील अवैध केलेले अर्ज पुन्हा अवैध ठरविले आहेत. अपिलानंतर अर्ज वैध ठरलेलेl उमेदवार पुढीलप्रमाणे ः विलास अमृतराव बांदल, अलका मालुसरे, मनोज निगडे, ज्ञानेश्वर पांडुरंग बागल, दिलीप महादेव रेणुसे, शिवाजी शहाजी बांदल, राजाराम दगडू कांबळे, राजेश गोविंद राऊत व रामचंद्र कुडले आदी उमेदवार आपले नशिब राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजमावणार आहेत.
आता परिवर्तन अटळ..राजगडच्या निवडणूक छाननीत बाद ठरलेले अर्ज वैध! ठरल्या नंतर ग्रामीण भागात चर्चा रंगताना दिसते.