राजेंद्र पाटील राऊत
मालेगाव च्या समस्या करीता जनविकास आघाडी चे एक दिवशीय उपोषण
:
मालेगाव तालुका प्रतिनिधी प्रकाश भुरे जैन युवा मराठा न्युज
मालेगाव:– शहरातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळें त्याचे लक्ष वेधण्यासाठी आज दि . 1 में 2022 महाराष्ट्र दिनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे
शहरात अनेक समस्यांचे डोंगर उभे राहीले असून मालेगाव शहर हे समस्या ग्रस्त झाले आहे मालेगाव शहर है दिवसेंदिवस वाढत आहे शहराची हद बाद सुध्दा झाली आहे त्यामुळे अनेकाची भुखंड ही शहरात वाढली आहेत ते कायम करून त्याच्या नोंदी कार्यालयात घेण्यात याव्या जेणे करून गरीबाना घरकुल योजनेचा लाभ घेता येईल शिवाय कुणला बँकेचे कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत मालेगाव शहरात कर ( टॅक्स ) हे अवाढव्य झाले आहे ते कमी करण्यात यावे खुल्या जागेचा कर ( टॅक्स ) हा खुप जास्त प्रमाणात आकारला गेला आहे तो कमी करण्यात यावा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून पाणी पुरवठा मात्र त्याच जुण्या यंत्रणेदारे होत आहे ते आपुरे व अनियमित होत आहे पाणी कर भरून सुध्दा पाणी मिळत नाही न.प्र.कार्यालयात कर्मचाऱ्याची अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे शहरातील काम होण्यास विलंब होत आहे . ती रिक्त पदे भरण्यात यावी भुखंडाच्या नोंदी होत नसल्याने शासनाच्या घरकुल योजनपासून बंचित राहत आहेत शहरात लाखो रुपये खर्चुन वृक्ष लागवड केली आहे मात्र त्यात भष्ट्राचार झाला आहे त्यातील 10 % झाडे जगली आहे त्याची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी शहारातील मेलेली जनावरे गावाबाहेर नेवून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी लाखो रुपयाचा ठेका दिला आहे मात्र मेलेली जनावरे ही आठवडी बाजारात फेकल्या जातात त्याची दुर्गंध पसरून लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे शहरातील रस्ते बाघकाम अत्यंत निकृष्ट दर्जचे झाले चक्क रस्त्यावरील गज उघडे पडले त्यामुळे महिलांना पाणी आनन्या साठी हातपंपावर जावे लागते त्यावेळी रस्त्यावरील उधडे पडलेले गज महीलाना व मुलाना इजा होऊ शकते यांचे जवाबदार कोन अशे प्रश्न निर्मान होत आहे व काही प्रभागा मध्ये निष्कृष्ठ दर्जेचे रस्ते झाले त्याच्या दर्जा तपासण्या व चौकशी करून त्यावर कार्यवाही करण्यात यावी शहरात अनेक समस्या असून त्यावर उपाय योजना म्हणून काहीच कारवाई केली नाही त्यासाठी आज नगर पंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून लक्ष वेधण्यात येत आहे . 15 में 2022 पर्यंत वरील सर्व समस्यांचे निराकरण झाले नाही तर जनविकास आघाडीच वतीने तिव्र व विविध आंदोलने छडण्यात येतील . यावेळी अमान शेठ मालवी भागवत बळी मोहम्मद जफर रामदास काटेकर प्रमोद सोमाणी किशोर महाकाळ आयुब सर रामदास बळी गणेश राऊत युनूसभाई पप्पु कुटे अमोल बळी विठ्ठल बळी किशोर शिंदे स्वानंद बळी अतिष बोकन योगेश मुंढरे सोनू अहिर अमोल पखाले यांच्या सह शेकडो लोक उपोषणाला बसले होते