राजेंद्र पाटील राऊत
🛑 जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजयजी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक व इतर नुकसान बाबत आढावा बैठक घेण्यात आली. 🛑
✍️ बीड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
बीड:⭕ जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा
सप्टेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानी संदर्भात, खरीप हंगाम २०२० पिक विमा वाटप बाबत सद्यस्थिती, खरीप हंगाम २०२१ पिक विमा तात्काळ मिळण्याबाबत मागणी केली.
अतिवृष्टीमुळे वीज पडून, विजेचा शॉक लागून पुराच्या पाण्यात वाहून मयत झालेल्या नागरिकांना, जनावरांना त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ रोख मदत मिळावी.
अतिवृष्टीमुळे सर्वच प्रकारच्या पिकांचे नुकसान झालेले आहे.
खरीप पिके, फळबागा, भाजीपाला सर्व प्रकारचे नुकसान झालेले आहे. कुठलाही शेतकरी या मदतीपासून वंचित राहू नयेत.
ग्रामसेवक, कृषी अधिकारी, कृषी साह्ययक यांनी सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकरी बांधवांना मदत करावी.
तालुक्यातील अनेक ठिकाणची रस्ते, पूल वाहून गेले आहेत, त्या पुलांची कामे लवकरात लवकर सुरु करुन नागरिकांना ये जा करण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत. पावसामुळे साथीचे रोग, आरोग्य विषयक ईतर समस्यांबद्दल उपाययोजना करण्याची विनंती केली.
बीड ते नवगण राजुरी रस्ता तात्काळ दुरुस्ती करणे बाबत PWD यांना निर्देश देण्यात यावेत. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्डे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावेत याबाबत सूचना केल्या.⭕