Home Breaking News नांदेडमध्ये पुन्हा एकदा गोळीबार “आधी गोळीबार, मग तलवारीने वार करून (गुंंडाचा) खून

नांदेडमध्ये पुन्हा एकदा गोळीबार “आधी गोळीबार, मग तलवारीने वार करून (गुंंडाचा) खून

286
0

नांदेडमध्ये पुन्हा एकदा गोळीबार “आधी गोळीबार, मग तलवारीने वार करून (गुंंडाचा) खून

नांदेड प्रतिनिधी / राजेश भांगे

नांदेड शहरात गँगवार संपता संपत नसून काल रात्री गाडीपुरा भागात अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून व तलावरीचे वार करून एकाचा निर्घृण खून केला.
तर विक्की ठाकूर असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे.

नांदेड मध्ये टोळीयुद्धाचा जोरदार भडका
जामिनावर सुटलेल्या विक्की ठाकूर या गुंडाचा खून
बिगानिया टोळीने हल्ला केला असावा असा पोलिसांचा संशय आहे.

नांदेड शहरात गँगवार व गोळीबार संपता संपत नसून काल रात्री गाडीपुरा भागात अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून व तलावरीचे वार करून एका गुंडचा निर्घृण खून केला.
विक्की ठाकूर असं खून झालेल्या इसमाचं नाव असुन टोळीयुद्धातून हा खून झाल्याचं सांगण्यात येतं.
मात्र भर रस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळं नांदेड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

विक्की ठाकूर हा जामिनावर नुकताच जामिनावर सुटला होता. काल साडेसात वाजण्याच्या सुमारास गाडीपुरा भागात रेणुका माता मंदिराच्या पूर्वेकडे असलेल्या एका गल्लीतून आत जाणाऱ्या रस्त्यावर तो स्वत:च्या घराजवळ उभा होता. तेव्हा दुचाकी गाड्यांवर आलेल्या सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्यांच्या गोळ्या झाडण्यात आल्या. पहिली गोळी चुकल्यानंतर तो जीव वाचवण्यासाठी धावू लागला. मात्र दुचाकीस्वारांनी त्याचा पाठलाग करत पुन्हा गोळ्या झाडल्या. त्यातली एक गोळी विक्कीच्या डोक्यात लागली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
विक्की पडल्याचे पाहून इतर काही जणांनी त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

वर्षभरापूर्वी विक्की चव्हाण नामक एका गुंडाचा असा खून झाला होता. विक्की ठाकूर हा त्याचाच साथीदार होता. कैलास बिगानिया टोळीशी त्यांचे वैर होते. याच बिगानिया टोळीने विक्की चव्हाण याचा खून केला होता. विक्की ठाकूरच्या खुनामागे देखील बिगानियाचा हात असावा, असा पोलिसांचा संशय आहे.
तर या प्रकरणी अधिक तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात असल्याचेही सुत्रांकडून सांगण्यात आले.

Previous articleचंदनपुरीत शिक्षण क्षेत्रच नासवले, हैवान रवि महालेला अटक केले…!!
Next article मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनमध्ये पुणे जिल्ह्यातील हवेलीपासून इंदापूरपर्यंत ४५ गावे होणार बाधित 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here