राजेंद्र पाटील राऊत
क्षात्रवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त — वयाच्या नवव्या वर्षी राजकारणात उतरलेले युवराज ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती, एक दैदीप्यमान पराक्रमी आणि तेवढाच खडतर जीवनप्रवास.
छत्रपती संभाजी महाराजांचा आज जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.
महापराक्रमी, संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज
आज 14 मे, मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान. देशाला अभिमान वाटावा अशी प्रेरणा देणारा आजचा दिवस होय. 14 मे 1657 रोजी महाराष्ट्र भूमीत अवतरला एक वीर पुरुष, छत्रपती संभाजी महाराज. थोरल्या आबासाहेबांचा, छ शिवाजी महाराजांचा हा छावा. या वीर योध्यास मात्र लाभले आयुष्य फक्त 32 वर्षाचे. फक्त 32. तेही अनेक संकटांनी खचाखच भरलेले. पण त्याने खचून न जाता एकएका संकटाच्या माथ्यावर पाय देऊन शत्रूंना आव्हान देत, त्यांचा थरकाप उडवीत सलग आठ वर्षे हा वीर लढत राहिला. सर्व बाजूनी अनेक शत्रूंनी स्वराज्यावर आक्रमण केलेले तरीही न डगमगता आणि शरणागतीचा चकार शब्द न काढलेला हा राजा लढत राहीला, स्वराज्य रक्षण करीत राहिला. लाखो सैन्य आणि प्रचंड खजिना घेऊन चालून आलेला औरंगजेब बादशहा, मराठ्यांचे राज्य समूळ नष्ट करण्याची प्रतिज्ञा केलेला बादशहा. केवढा मोठा लढा असेल तो कल्पना करा.
पण या लढ्यात शेवटी दुर्दैवाने हा राजा पकडला गेला आणि अत्यन्त हाल हाल करून शेवटी त्या बादशहाने त्याना 11 मार्च 1689 रोजी ठार मारले.
या राजाचा खराखुरा इतिहास देशापुढे येण्याची फार गरज आहे. अनेकांनी त्याना बदनाम करणारे लिखाण केलेले आहे पण अलीकडे संशोधक व लेखकांनी खरा संभाजी राजा कसा होता हे दाखवायला सुरुवात केली आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे.
आज संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त अनेक संशोधकांनी, लेखकांनी असा निर्धार करावा की या राजाच्या कामगिरीवर लिखाण करून तो त्याना एक मानाचा मुजरा ठरेल.
जयंतीनिमित्त संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
🖋️ शिवश्री सुनिल शेवाळे संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी शहराध्यक्ष नाशिक 857817280