राजेंद्र पाटील राऊत
लॉकडाऊनचा निर्णय आठ तासांत मागे
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीनंतर लगेचच बुधवारपासून लॉकडाऊनच्या निर्णयावरुन समाज माध्यमांवर टिकेचा भडिमार झाल्यानंतर मंगळवारी आठ तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आला . लॉकडाऊन नाही तर नागरिकांनी १३ तारखेपर्यंत उत्स्फूर्तपणे जनता कप ! पाळावे असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी केले .
कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली गोकुळची निवडणूक नुकतीच पार पडली , मंगळवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील तीनही मंत्री व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला . दुपारी साडेतीन वाजता याबाबतची बातमीदेखील माहिती कार्यालयाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली . त्यानंतर कोल्हापुरकरांनी संताप व्यक्त करत फेसबुक , ट्विटर , व्हॉटसअपवर टिका करायला सुरूवात केली , गोकुळ निवडणुकीवरून सर्वच राजकीय नेत्यांना शेलक्या भाषेत ट्रोल करण्यात आले . सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते ,त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर जनता कयूंचा निर्णय घेण्यात आला . तीनही मंत्र्यांच्यावतीने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध करुन नागरिकांना १३ तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे .