राजेंद्र पाटील राऊत
उद्योजिका रुक्मिणी खताळ यांचे निधन
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील हॉटेल जय शंकर च्या मालकीण रुक्मिणी शंकरराव खताळ यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवारी दुपारी तीन वाजता निधन झाले. मृत्युसमयी त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, दोन सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
रुक्मिणी खताळ यांनी तयार केलेली शेंगा चटणी, डिंक लाडू ,मका पोहे चिवडा सोलापूर जिल्ह्यासह राज्यात, देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध झाला होता. जय शंकर हॉटेल च्या माध्यमातून त्यांनी विविध पदार्थ प्रसिद्ध केले होते. लांबोटी गावची ओळख ही जय शंकर हॉटेल च्या नावाने झाली होती.
त्यांना मिळालेले पुरस्कार
रुख्मिणी खताळ याना १९८० साली मेनसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते., महाराष्ट्र वन चॅनल च्या वतीने महिला दिनानिमित्त यशस्वी महिला उद्योजिका व आयकॉन ऑफ सोलापुर ,पुरस्कार देऊन मुंबई येथे सन्मानित करण्यात आले होते. बारामती येथील शारदा प्रतिष्ठानचा “अदर्शमाता” हा पुरस्कार त्याना 8 मार्च 2016 रोजी प्रदान करण्यात आला होता.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे च्या वतीने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने ही त्यांना पुरस्कार देण्यात आला होता.
यशस्वी महिला उद्योजिका आणि आदर्श माता असे त्यांना विविध शेकडो पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या कार्याची दखल विवीध चॅनेलने ही घेतली होती.