राजेंद्र पाटील राऊत
ग्रामपंचायत कडून अतिक्रमीत जागेवर कारवाई. पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
डहाणू तालुक्यातील चिखला गावातील नाईक पाखडी भाट पाडा हा रस्ता वर्षानुवर्षे अतिक्रमणे व्यापलेला होता. गावातील मुख्यरस्त्या लगत गट क्रमांक 202मध्ये दोन्ही बाजूला अतिक्रमणं केले असल्या मुळे रास्ता अरुंद झाला होता. गाडी घेऊन येजा करणाऱ्या प्रवाश्याना नेहमीच त्रास सोसावा लागत असल्या मुळे चिखले ग्रामविकास अधिकारी मनोज इंगळे, सरपंच अनिता कवठे,उपसरपंच अनिल गावडे यांनी गावात अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेऊन रस्यावरील अतिक्रमण हटवून रुंद रस्ता तयार करण्यात आला. तेथील गावकरी नरेश काकऱ्या हे आपल्या वैयक्तिक खर्चातून रस्त्याकरिता माती व मुरूम भराव देणार असल्या मुळे सुलभ रहदारी करिता चिखले गावाचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे.