Home मुंबई मराठी नायिका ऐश्वर्या राणे यांची आर्थिक मदतीसाठी वणवण

मराठी नायिका ऐश्वर्या राणे यांची आर्थिक मदतीसाठी वणवण

268
0

राजेंद्र पाटील राऊत

मराठी नायिका ऐश्वर्या राणे यांची आर्थिक मदतीसाठी वणवण

मुंबई : मराठी चित्रपटाचे प्रसिध्द अभिनेते अशोक सराफ यांच्या धुमधडाका या मराठी चित्रपटात नायिकेचे काम करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांची आर्थिक मदतीसाठी वणवण सुरू आहे. औषधोपचार आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी त्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर मदत गोळा करत आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत सहकलाकार म्हणून काम केलेल्या ऐश्वर्या राणे या आता ओळखताही येणार नाहीत अशा अवस्थेत आहेत. राज्य शासनाकडे वारंवार मदत मागण्याची माझी इच्छा नाही, पण त्यांनी माझी अवस्था पाहून मदत करणे आवश्यक आहे, असं त्या म्हणाल्या. त्या पुढे मुंबादेवी, महालक्ष्मी, शिर्डी, बाबुलनाथ अशा विविध मंदिरांबाहेर जाऊन आर्थिक मदत जमा करणार आहेत.
ऐश्वर्या राणे या सिंधुदुर्गमधील त्यांच्या गावच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र लॉकडाउनमुळे पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. या प्रवासात त्यांचे कपडे आणि इतर सामानही चोरीला गेले होते. त्यावेळी खासदार रामदास आठवलेंनी ऐश्वर्या यांना त्यांच्या स्वतःच्या घरात आसरा दिला होता.
मर्द’ या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी ऐश्वर्या राणे यांचा अपघात झाला होता. घोडेस्वारी करताना त्या पडल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्या पाठीच्या कण्याला जबरदस्त दुखापत झाली होती. त्यानंतर त्या उपचारासाठी परदेशीही गेल्या होत्या. मात्र उपचाराचा खर्च त्यांना पुढे परवडेनासा झाला. ऐश्वर्या राणे यांचं घर, दागिने, थोडेफार जमा केलेले पैसे उपचारासाठीच गेले. तेव्हापासून त्या सिनेसृष्टीपासून दुरावल्या.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleशेतकऱ्यांना मिळणार एक ते तीन लाखांचे बिनव्याजी पीककर्ज ; राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
Next articleशिवजयंती साध्यापद्धतीने साजरी करा, ठाकरे सरकार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here