Home नांदेड नांदेड जिल्ह्यात 1013 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया तर 907 ग्रामपंचायतीसाठी होणार मतदान…

नांदेड जिल्ह्यात 1013 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया तर 907 ग्रामपंचायतीसाठी होणार मतदान…

105
0

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्ह्यात 1013 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया तर 907 ग्रामपंचायतीसाठी होणार मतदान…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यात एकूण 1309 ग्रामपंचायतींपैकी 1015 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार होते यापैकी मुखेड तालुक्यातील जांब व कंधार तालुक्यातील आलेगाव या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुकी रद्द झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्ष 1013 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. 1013 ग्रामपंचायतींपैकी पूर्णतः बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या 85 इतकी आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण जागांपैकी काही जागेसाठी वैध नामनिर्देशन पत्र अपात्र असल्याने व उर्वरित जागा बिनविरोध झाल्याने प्रत्यक्ष मतदान होणार नाही. अशा ग्रामपंचायतीची संख्या 21 तर प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या 907 इतकी आहे . एकूण जागांची संख्या 8 617 इतकी असून एकही वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने रिक्त राहिलेल्या जागांची संख्या 102 तर माघारीच्या दिनांक नंतर 1 जागेसाठी फक्त एकच वैध नामनिर्देशन पत्र उरल्याने बिनविरोध निवडणूक झालेल्या जागांची संख्या 1653 तर प्रत्यक्ष जिल्ह्यात मतदान होणाऱ्या जागांची संख्या एकूण 6862 इतके आहे. अशी माहिती आज रोजी उपजिल्हाधिकारी श्री शरद मंडलिक यांनी दिली आहे.

Previous articleवंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारणी जाहीर…
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर आगमन       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here