Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य महामंडळाने वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना

महाराष्ट्र राज्य महामंडळाने वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना

89
0

राजेंद्र पाटील राऊत

महाराष्ट्र राज्य महामंडळाने वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेत जादा कर्मचारी व अधिकारी वर्गाने सहभागी होण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती संमतीपत्र भरावयाची तारीख कर्मचाऱयांच्या मागणीनुसार आता आणखीन महिनाभराने वाढविण्यात आली आहे.
एसटी महामंडळाकडून ८ डिसेंबर २०२० रोजी स्वेच्छानिवृत्ती योजनेचे परिपत्रक जारी करण्यात आले होते. सर्व विभागांना ते पाठविण्यात आले होते. स्वेच्छानिवृत्तीकरिता संमतीपत्र कामगाराकडून भरून घेणे व ते मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्याची मुदत यापूर्वी २ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविली होती.
आता ताज्या आदेशानुसार स्वेच्छानिवृत्ती संमतीपत्र कर्मचाऱयांकडून २२ जानेवारी २०२१ पर्यंत स्वीकारून स्वेच्छानिवृत्ती योजनेचे माहिती विवरण पत्र ‘अ’ आणि ‘ब’ मधील तपशील भरून २८ जानेवारी २०२१ पर्यंत ई-मेलवर तसेच टपालाद्वारे पाठविण्यात यावे असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱयांची संख्या सुमारे एक लाख आहे. यापैकी ५० वर्षे आणि त्यापुढील कर्मचाऱयांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना सादर करण्यात आली आहे. ५० वर्षे आणि त्यापुढील कर्मचाऱयांसाठी साधारण २७ हजार इतकी आहे. एसटी महामंडळाला वेतनावर दर महिन्याला १०० कोटी रुपये खर्च करावे लागतात. या योजनेमुळे एसटी महामंडळाचे वार्षिक १२०० कोटी रुपये वाचणार आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱयास उर्वरित प्रत्येक वर्षासाठी ३ महिन्यांचे वेतन (मूळ वेतन अधिक महागाई भत्ता) देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाला या योजनेसाठी सुमारे १४०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

युवा मराठा न्यूज.

Previous articleदेगलूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी देण्यात आले निवेदन..
Next articleइंडियाची वॅक्सिन कोविशिल्ट आणि कोवॅक्सिन दोन्ही लस पूर्णपणे सुरक्षित
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here