राजेंद्र पाटील राऊत
औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच झालं , लवकरच कागदपत्रात दुरुस्ती , भाजपवाल्यांनी वळवळ करु नये
युवा मराठा न्यूज नेटवर्क पुणे प्रतिनिधी महादेव घोलप
मुख्यमंत्री:उध्दव ठाकरे
मुंबई : ‘ शिवसेनेने भूमिका बदललेलीच नाही . हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले . हे नामांतर लोकांनी स्वीकारले . प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा . त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल . भाजपास त्याची काळजी नको , ‘ असे म्हणत शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून भाजपवर घणाघाती टीका केली . तसेच महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे . ‘