Home कोल्हापूर कोल्हापूर शहरात थुंकीमुक्त आभियान

कोल्हापूर शहरात थुंकीमुक्त आभियान

221

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर शहरात थुंकीमुक्त आभियान

कोल्हापूर शहरात गेली अडीच महिने शहरभर मोकाट रोगराई पसरवत फिरणाऱ्या थुंकी बहाद्दरांना चाप लावण्यासाठी अनेक नागरिक व सामाजिक संघटना यांनी सोशल मीडिया, तसेच रस्त्यावर उतरून युद्ध पुकारले आहे. आज अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात जनजागृती मोहीम राबवली. पालिका सक्रिय झाली आहेच, पण शासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणीही नागरिक, सामाजिक संस्था कडून केली जात आहे.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कडून जन जागृती पर बॅनर्स, स्टिकर्स वितरण करण्यात आले. तसेच परिसरातील दुकानामध्ये, बस स्थानकातील बसेस वर प्रबोधन करून स्टिकर्स लावण्यात आले.
रोगप्रसार,सामाजिक स्वच्छता व आरोग्य यांच्याशी निगडित गंभीर विषयाबाबत नागरिक तसेच विविध संघटना मोठ्या संख्येने एकत्र येऊन सक्रिय पाठिंबा देत आहेत.
या प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळ कृती समितीच्या कोल्हापूर च्या कार्यकर्त्यांसह, भागातील नगरसेवक आशिष ढवळे, पानपट्टी संघटनेचे अरुण सावंत, फेरीवाले संघटनेचे कॉम्रेड दिलीप पवार, खाजगी बस प्रवासी संघटनेचे सतीशचंद्र कांबळे, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चे अध्यक्ष एस. एन. जांभळे, आरटीओ अधिकारी प्रदीप शिंगारे, फेरीवाले संघटना, नागरिक , प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.या उपक्रमाचे नेतृत्व दीपा शिपुरकर,राहुल राजशेखर,अभिजीत गुरव,सुनीता मेंगाणे, महेश ढवळे, विजय धर्माधिकारी यांनी केले .
युवा मराठा न्यूज नेटवर्क

Previous articleमा श्री आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांचा सत्कार..
Next articleमुखेड तहसील कार्यालयावर लाल बावटा शेतमजूर युनियनचा भव्य मोर्चा धडकला…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.