Home Breaking News *विवाहित पीडितेचा सी.आर.पी.एफच्या जवानाकडून हुंड्यासाठी अमानुष असा छळ* *खून करण्याचा डाव अखेर...

*विवाहित पीडितेचा सी.आर.पी.एफच्या जवानाकडून हुंड्यासाठी अमानुष असा छळ* *खून करण्याचा डाव अखेर फसला*

131
0

*विवाहित पीडितेचा सी.आर.पी.एफच्या जवानाकडून हुंड्यासाठी अमानुष असा छळ* *खून करण्याचा डाव अखेर फसला* अहमदनगर, (प्रा, ज्ञानेश्वर बनसोडे, प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- १८/५/२०१४ रोजी एका सुसंस्कृत घराण्यातील अहमदनगर जिल्ह्यातील मुलीचा विवाह वकती पानवी ,ता,वैजापूर, जिल्हा, औरंगाबाद, या सी आर पी एफ च्या तरुणाशी तातेराव दिनकर जाधव मोठ्या थाटात संपन्न झाला, दरम्यान च्या काळात त्यांना मनस्वी नावाची एक मुलगी होऊन संसार सुखात चालू असतानाच पतीला दारूचे व्यसन जडले, व माहेर कडून चार चाकी गाडी व प्लॉट घेण्यासाठी तगादा सुरू झाला , लाडात वाढलेल्या मुलीला त्रास नको म्हणून विवाहितेच्या वडिलांनी आपल्या ऐपतीप्रमाणे बरीच मदत केली,परंतु ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा असा विचार त्या मतलबी जावयाने केला, व त्याचे नातेवाईक १) साईनाथ दिनकर जाधव (दिर) २) कामिनी साईनाथ जाधव (जाउबाई) ३) शशिकला दिनकर जाधव,(सासू) सर्व राहणार- , ववक्ती -पानवी ,ता,वैजापूर ,जिल्हा, औरंगाबा(पतीसह) या ४ हैवानांनी तिचा अमानुष असा छळ सुरू केला, (उपाशी ठेवणे, घरात पलंगाला बांधणे, नाका तोंडत पाणी ओतणे,लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, आदी अमानुष प्रकार चालू केले,की जेणे करून माहेरऊन पैसें आणील, परंतु मरायचे तर नवऱ्याच्याच दारात ,आपले घराणे खानदानी आहे, वडिलांच्या नावाला कलंक नको, म्हणून सर्व सहन करीत असे, आता ही काही केल्याने माहेरऊन पैसे आणत नाही असा त्या हैवानाचा समज होताच ,तिला माहेरी आणून सोडले, थोडा कालावधी लोटल्या नंतर विवहितें ने राहाता न्यायालयातून नादण्यास न्यावे म्हणून अर्ज केला असता, संबंधितांनी तिला १०/८/२०२० रोजी कोर्टामार्फत घेऊन गेले, तो राग मनात धरून खून करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्या ४ हैवानांनी तिला वैजापूर या ठिकाणी भाडोत्री खोली घेऊन तेचे राहू लागले, व दि ६/९/२०२० रोजी मधे रात्री तिला अतिशय अमानुष पणे मारहाण करून जम्मू काश्मीर येथे दि,७/९/२०२० रोजी या तीन हैवानांच्या ताब्यात देऊन हिचा खून करून टाका ,मी देश रक्षक आहे, मी तुम्हाला सहीसलामत सोडवतो असे म्हणून कामावर निघून गेला, आता मात्र आपला खून होणार व आपल्या ४ वर्षच्या मुलीला ही मारून टाकणार अशी विवाहीतेची खात्री होताच ,तिने माहेरी संपर्क केला, तात्काळ माहेरची मंडळी वैजापूर या ठिकाणी गेली, व त्यांचे खोलीतील होते नव्हते सर्व सामान ,वक्ती गावचे सरपंच श्री गुडदे ,व नंदवी श्री गौतम आल्हाट यांच्या मार्फत टेम्पो क्रमांक एम एच २० बी टी,३५६३ने त्यांच्या स्वाधीन केले, अंगावरील सर्व दागिने सासुकडे सुपूर्त केले ,व पतीची पलसर गाडी ही दिराच्या ताब्यात देऊन तातडीने वैजापूर पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदविली, पण तेथिल पोलिसांनी म्हणावी अशी दखल न घेता पाहिजे तशी नोंद घेतली नाही, व त्याच दिवशी आपणावर फिर्याद दाखल केली असे समजताच पती राज्याने मो न 8082772375 या मोबाईल क्रमांकावरून शिव्यांचा भडिमार करून म्हणाला कि” मी व माझा भाऊ देशरक्षक आहोत, त्या मुळे तुझ्या सर्व नातेवाईकाना गोळ्या घालून ठार करू, आमचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी दिली आहे,दि २६/९/२०२० रोजी पीडित विवाहितेने संबंधित या ४ सैतानांवर कडक कारवाई करून श्याशन व्हावे म्हणून ,पोलिस अधीक्षक, अहमदनगर ,,पोलिस अधीक्षक ,औरंगाबाद जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्यमंत्री ,उद्धवजी ठाकरे साहेब गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, संरक्षण मंत्री ,महाराष्ट्र राज्य आदींना विनंती तक्रार अर्ज करून ही अद्याप पर्यंत दखल घेण्यात आली नाही,परंतु सबाबांधित नराधम हा मला व माझ्या ४ वर्षाची चिमुरडी व माझ्या आई वडील ,व एकुलत्या एक भावास गोळ्या घालून ठार मारल्याशिवाय राहणार नाही ,अशी पक्की खात्री विवाहितेच्या मनाची झाली आहे , सदर पती राज याचे औरंगाबाद येथील एका मुलीशी अनैतिक संबंध असल्या चे पुरावे या विवाहीतेकडे आहेत, या त्याच्या बाहेर ख्याली संबंधातून त्याचा विवाहीतेस खून करून मारून टाकण्याचा इरादा अखेर असफल ठरला,थोडक्यात “देवतारी त्यास कोण मारी “याची प्रचिती येथें येते, या पीडित विवहितें ची संबंधित प्रशासन व व माझ्या सर्व माता पित्या ना व भावा ना कळकळीची विनंती आहे की ,या बाबत शासनापर्यंत आवाज उठवा ,संबंधित नराध्यमांस निलंबीत करा ,असा देश रक्षक असू शकतो का,? हा देश रक्षक नसून राक्षस आहे,विकृत मनोवृत्तीचा हा राक्षस आतंकवाद्यांस सामील होऊन आपला हा पवित्र देश अडचणीत आणील, थोडक्यात”म्हातारी मेल्याचे दुःख नाही ,पण काळ सोका ऊ नये”अशी खंत या विवाहित पीडितेची आहे, ,म्ह णून या ४ ही विकृत मनोवृतिच्या सैतानाना निलंबित करून कडक शासन व्हावे, नाहीतर नाविलाजास्तव मला माझ्या ४ वर्षाच्या चिमुरडीसह या प्रकरणी उचित अश्या कार्यालया समोर आत्मदहन करावे लागेल असा इशारा दिला आहे

Previous articleबीड जिल्ह्यातील किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी केली कोरोना विषयी जनजागृती.
Next article🛑 धनगर समाजाच्या आरक्षणासाठी , संभाजीराजे पुढाकार घेणार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here