*एस.टी. प्रशासनाचे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष.*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
राज्यातील सर्वच एस.टी. महामंडळातील कामगारांची स्थिती हलाखीची आहे. आधीच पगार कमी मिळतो, त्यात तीन महिन्यांपासून पगार नाही अशा परिस्थितीत ह्या कर्मचाऱ्यांनी पोटाची खळगी भरायची कशी ? असा प्रश्न कर्मचार्यांना पडला आहे. दोन डझन संघटना असतांना आणि शक्तिशाली मान्यताप्राप्त संघटना कार्यरत असतांना कामगारांवर उपासमारीची वेळ येणे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.
त्यातच कर्मचार्यांना covid-19 ची लागण होत आहे , पैकी बेचाळीस कर्मचारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत आणि त्यातील फक्त सहा जणांना विमा संरक्षण दिले गेले आहेत उर्वरित छत्तीस कर्मचार्यांना वेगवेगळ्या अटी लाऊन विमा नाकारला गेला आहे. अशा परिस्थितीत, पैसा आणायचा कुठून ? कर्तव्यावर जावं की नाही ? आपल्या पाठीमागे आपल्या कुटुंबाचे काय हाल होतील ?
शासन दरबारी आपलं गार्हाणं पोहोचतंय की नाही ? पोहोचत असेल तर त्यावर प्रशासन उदासीन का ? काय सर्वच महामंडळाचे हेच हाल होत आहेत का ? तसेच कर्तव्य पार पाडताना प्रशासनातर्फे कुठलीही संरक्षक जबाबदारी उचलली जात नसताना, आपण काय आणि कसे करायचे ? असे एक-ना-अनेक प्रश्ण कर्मचार्यांना पडलेले आहे. Covid-19 चा प्रभाव जास्त प्रमाणात वाढला असतांना नो-सोशल डीस्टंसींग, नो-मास्क, नो-सॅनिटायजेशन अशा पद्धतीने एसटी कामगारांना ह्या महामारीचा सामना करावा लागत आहे. आणि ह्यावर डझनबर संघटना मूग गिळून गप्प बसल्या आहेत.
म्हणून एसटी कामगारांचे शोषण होत आहे. ह्याकडे प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे असे दिसून येते.