आशाताई बच्छाव
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थां – विद्यार्थींनीचा गाव नारशिंगे येथे सत्कार रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थीनींचा सत्कार हा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवणारे रेवती मारुती आग्रे, अमरदिप संतोष कांबळे, पूर्वा संदिप कांबळे, प्रेरणा प्रकाश कांबळे, प्रकाश रामचंद्र गोताड, सिद्धी सुभाष कांबळे, दिक्षा दिपक आग्रे व बारावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवणारे मनिष उदय पवार, मृणाली महेंद्र कांबळे या विद्यार्थी – विद्यार्थीनींचा यावेळी गौरव करण्यात आला.
याप्रसंगी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे संस्थापक / अध्यक्ष सुनिल धावडे, सचिव समिर गोताड, खजिनदार गणेश कांबळे, कार्याध्यक्ष संतोष आग्रे, संघटक समिर धावडे, प्रवक्ता संगम धावडे, मिडिया प्रमुख नितिन रोडे, सदस्य संदेश धावडे, सचिन धावडे, प्रकाश गोताड, चंद्रकांत गोताड उपस्थित होते.
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे सचिव यांनी पारितोषिक वाचन,आभार प्रदर्शन आणि निवेदन केले.