आशाताई बच्छाव
परळी शहरात शरीराला घातक असे रसायनयुक्त फळे विक्रीला
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि: ०४ परळी शहरात फळ विक्रेते शरीराला घातक असे रसायन सर्रास वापरत असून, प्रेस्टिसाइड नावाच्या केमिकल मुळे कर्करोग होतो. आत्तापर्यंत कधीच फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली नाही. परळी शहरातच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात रसायनयुक्त फळे फळविक्रेत्यांकडून विकले जात आहेत. परळी शहरात तर फळ विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशा केमिकल असलेल्या फळामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण शहरात वाढत आहेत. त्यामुळे शहरातील दवाखान्यांमध्ये गर्दी दिसून येत आहे. फळ लवकर पिकावे म्हणून फळ विक्रेत्यांचा केमिकल चा येथेच्छ वापर होत आहे. स्वतःची आमदनी वाढवण्यासाठी फळ विक्रेत्यांकडून जनतेच्या आरोग्याशी, जिवाशी खेळले जात आहे. तसेच केज शहरातील प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर बालासाहेब आस्वले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की फळ लवकर पिकावे व जास्त दिवस टिकण्यासाठी काही केमिकल चा वापर फळ विक्रेत्याकडून केला जातो त्यात प्रेस्टिसाइड या केमिकलचा वापर केला जातो. ज्यामुळे कर्क (कॅन्सर) रोगासारखा गंभीर आजार होऊ शकतात. उदाहरणार्थ: केळी घेताना केळी पिवळी दिसते पण केमिकल मध्ये पिकवल्याने त्याचे देठ हे हिरवेच असते. दोन दिवसात संपूर्ण केळी काळी पडते. असेच आता आंब्याचा सिझन चालू होईल यात ग्राहकाला सांगितलं जात की, आंबा हा एसी मध्ये पिकवला जातो पण ग्राहक कधीच त्या गोडाऊन पर्यंत जाऊन पहात नाही की तो कशात पिकवला जातो तो पण केमिकल मध्येच पिकवतात. वरवर जरी आंबा पिकलेला वाटत असेल तर आत मध्ये पांढरा व आंबट असतो. तरी जनतेने फळ विकत घेते वेळेस शहानिशा करूनच फळे विकत घ्यावीत व आत्तापर्यंत या फळ विक्रेत्यांवर कुठलीच कारवाई होत नाही त्यामुळे यांचा निरडपणा वाढला आहे. तरी येथून पुढे फळ विक्रेत्यांचे लायसन तपासून केमिकल युक्त आरोग्यास धोकादायक फळ विक्रेत्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनाकडून होत आहे.






