Home बीड जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतही आता नवीन होणार!

जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतही आता नवीन होणार!

102

आशाताई बच्छाव

IMG_20240121_075729.jpg

जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतही आता नवीन होणार!

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:२० जानेवारी २०२४ बीड जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ही आता नवीन होणार असून नवीन इमारत तीन मजली असणार आहे.याची निविदा मंजुरीसाठी मुंबईला पाठविण्यात आली आहे.बीड जिल्ह्यात असलेल्या मुख्य प्रशासकीय काही इमारतीचे नूतनीकरण करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.यानुसार यापूर्वी पंचायत समितीची इमारत नवीन जागी नव्याने चांगली प्रशस्त बांधण्यात आली आहे.यानंतर बीड तहसील कार्यालय असलेली प्रशासकीय इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्यास शासनाची मंजुरी मिळाली असून लवकरच इमारत पाडण्याचे काम सुरू होणार आहे.पंचायत समिती तहसील नंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया तयार करण्यात आली असून साठी मुंबईला पाठविण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य इमारतसाठी निविदा तांत्रिक मंजूर झाली आहे.आता अंतिम मंजुरीसाठी मुंबई येथील मंत्रालयात निविदा पाठविण्यात आली आहे.निवेदनुसार बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत तीन मजली असणार आहे.त्याचे ऐकुन बांधकाम १३००० स्क्वेअर मीटर मध्ये होणार आहे. ग्राउंड फ्लोअरला पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, फायर सेफ्टी,रेन हार्वेस्टिंग अशा अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या इमारतीमध्ये प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र कार्यालय असतील असे नियोजन करण्यात आले आहे.

Previous articleके. के. वाघ महाविद्यालय चांदोरीचे ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबिर–
Next articleगेवराईत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत; ५० जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.