आशाताई बच्छाव
मुंबईतील ६६ वी विवेकानंद व्याख्यानमाला.
मुंबई -: प्रतिनिधी विजय पवार
चिंचपोकळी येथील विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या वतीने ६६ व्या विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन लालबाग येथील गरमखाडा मैदानात २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत रात्रौ ८.३० वाजता करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प २८ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे राज्याभिषेक जाणत्या राजाचा या विषयावर तर २९ नोव्हेंबर रोजी दुसरे पुष्प मी वगैरे या विषयावर कवी आणि गीतकार वैभव जोशी बोलणार असून त्यांची मुलाखत समीरा गुजर- जोशी घेणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी तिसरे पुष्प विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे कुतूहल चांद्रयानाचे या विषयावर तर १ डिसेंबर रोजी चौथे पुष्प उद्योजक आणि प्रशिक्षक महेंद्र शिंदे नव्या युगाचे नवे पालक या विषयावर तर पाचवे आणि अंतिम पुष्प २ डिसेंबर रोजी नवीन शैक्षणिक धोरण : संधी आणि आव्हाने या विषयावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी गुंफणार आहेत. संस्थेचे सभासद, विभागातील नागरिक तसेच जाहिरातदारांनी व्याख्यानमालेला उपस्थित रहावे असे आवाहन व्याख्यानमाला प्रमुख निलेश घोडेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९९८७२२९२१६.
स्थळ- लालबाग, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, (गरमखाडा मैदान), डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, मुंबई 400012