आशाताई बच्छाव
शॉक सर्किटमुळे शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग लागुन झालेल्या नुकसानाची भरपाई द्या ,अन्यथा कैलाश कडाळे पाटिल यांचे महावितरण कार्यालयास उपोषणाचा ईशारा !
ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
संग्रामपूर:-संग्रामपूर बोडखा रोड ला लागुन असलेल्या डि,पी, वर शार्टसर्किट मुळे दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी गट नं, १३० मध्ये आग लागुन शिवदास ओंकार घिवे व काशिराम विश्वनाथ कडाळे यांच्या मालकिच्या गोठ्याला आग लागुन सुमारे दोन लाख रूपयाचे शेती उपयोगी वस्तुचे नुकसान झाले होते. महसुल विभागाने तसा रीतसर पंचमाना केला होता .परंतु महावितरण कार्यालय संग्रामपुर यांनी चार महीने ऊलटुन आद्यापही कार्यवाही केली नसुन वरील शेतकऱ्यांस नुकसानभरपाई दिली नाही . महावितरण कार्यालयास माहीती विचारली असता उडवा उडवी ची उत्तरे देत आहेत याची गांभिर्याने दखल घेत नसल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यात अडचन निर्णान होत आहे . वरील विषयाची सात दिवसाच्या आत दखल न घेतल्यास दि.०१ सप्टेंबर २०२२ रोजी महावितरण कार्यालय संग्रामपुर येथे शिवसेनेच्या वतिने आमरण उपोषण करण्यात येईल . त्यामुळे उद्भवणाऱ्या परीनामास सर्वस्वी जबाबदारी महावितरण कार्यालय संग्रामपुर यांची राहील. असे निवेदन देण्यात आले असून निवेदनावर शिवसेना उप तालुका प्रमुख कैलाश कडाळे पाटिल , गोकुल घिवे , भैय्या पाटिल ,ज्ञानेश्वर घाईट ,शुभम चंदनपाठ ,रोहन घिवे, निलेश पाटिल व ईतर शेतकरी ,शिवसैनिकांच्या सह्या असुन असे निवेदन शिवसेना संग्रामपुर तालुक्याच्या वतिने देण्यात आले आहे . परंतु विशेष म्हणजे संग्रामपुर तालुक्यात नागरिकांना न्याय व हक्कासाठी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागतो परंतु उपोषण करता सुद्धा उपोषणातून गायब केला जातो किंवा होतो याबाबत तपास चालू आहे परंतु संग्रामपूर तालुक्यात अधिकारी वर्गांमध्ये “तेरी भी चूप मेरी चूप” अशा प्रकारे मनमानी चालू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना न्यायासाठी जीव मुठीत धरूनचं या तालुक्यात उपोषणास बसावे लागतो असेच काहीसे म्हणावे लागेल. कारण उपोषण करता गायब होण्याचे असे सुद्धा प्रकार या तालुक्यात घडत आहेत. त्यामुळे होणाऱ्या परिणामास व उपोषणकर्त्याच्या जीवाची सर्वस्वी जबाबदारी लक्षात घेता वेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.