Home मुंबई शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट

शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट

140

आशाताई बच्छाव

Screenshot_20220805-210209_Google.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे:   शिंदे सरकारचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा मोठा गोप्यस्पोट ! सुरत व गुहाटी ला गेल्यानंतर खरे काय घडले त्या पाठीमागचे सविस्तर शिंदे गटचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी खूप मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले उद्धव ठाकरे सोबत आमचे बोलणे झाले असता त्यांनी शिवसेनेसोबत भाजपाची युती व्हावी असे वाटते परंतु शिंदेंना बाजूला ठेवावे लागेल असे मागणी त्यांनी केली. प्राण्यांनी केलेल्या वक्त्याबद्दल भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरही बोललो होतो व नाराजी व्यक्त केली होती. राणे यांना भाजपाचे मंत्रिपद मिळाले त्यामुळे ठाकरे नाराज होते. राणेंना मंत्रिपद देऊ नये असे ठाकरेंची मागणी होती. सुशांत सिंह राजपूत या प्रकरणाबद्दल आदित्य ठाकरे यांची बदनामी झाली त्यामुळे शिवसैनिक तसेच आम्ही सर्व नाराज होतो असे केसरकरणे सांगितले. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी असे सांगितले की आम्ही शिंदेंना बाजूला ठेवून सत्ता स्थापन करू शकत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे व भाजपाचे मिळते जुळते घेणे अवघड होऊन बसले होते. उद्धव ठाकरे यांच्या या सर्व भूमिकांमुळे आम्हाला सुरत व गुवाहाटी या ठिकाणी जाऊन भाजपा बरोबर सत्ता स्थापन करण्याचं व शिवसेनेचे स्थान टिकवण्याचं काम करावं लागलं. बाळासाहेब ठाकरेंचे विचार व शिवसेनेचे विचार यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते करत राहणार. आम्ही अजूनही शिवसेनेचेच आहोत हेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारचे खुलासे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले.

Previous articleदेगलूरमध्ये आज शिवसेनेचा विविध मागण्यासाठी रास्ता रोको पडला पार
Next articleदेशभरात काँग्रेसचे आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.