आशाताई बच्छाव
जिल्हा परिषद पंचायत समितीचे गट गण रचना रद्द मुंबई,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)- महाराष्ट्रात आगामी काळात घेतल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या गट गण साठी करण्यात आलेली रचना रद्द करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत असून,मनमानी पध्दतीने घटनाबाहय केलेली गट व गणाची रचना रद्द करण्यात आल्याने आता सन २०१७ च्या गट गण रचनेनुसारच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूका होणार असल्याने अनेक इच्छूक व गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्यांचा मोठा हिरमोड झाला आहे तर मातब्बरांना देखील या गट गण रचना रद्द प्रकरणाचा मोठा फटका बसला आहे.