आशाताई बच्छाव
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री मा वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने 1 जुलै हा कृषी दिन म्हणून मौजे अंगलगाव तांडा येथे साजरा करण्यात आला.
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)
(परभणी) जिंतूर:- दि ०१ जुलै तालुक्यातील अंगलगाव तांडा येथिल प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सकाळी 8:00 वाजता कृषी दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ लक्ष्मीबाई कंकर जाधव तर प्रमुख पाहुणे मा सुदामराव घुगे, सेवानिवृत्त विभागीय बीजप्रमाणिकरंन, विशेष मार्गदर्शक एस पी काळे तालुका कृषी अधिकारी जिंतूर, प्रगतशील शेतकरी श्री आर के घुगे यांनी उपस्थित शेतकरी यांना मार्गदर्शन केले.
यामध्ये तालुका कृषी अधिकारी श्री काळे यांनी सोयाबीन पिकावरील कीड, रोग या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले व शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून शेंद्रिय खताचा वापर करावा यासाठी कृषी विभागाच्या वतीने अनुदान दिले जाते, तसेच गांडूळ खत व मा (जिल्हाधिकारी)परभणी ,श्रीमती आंचल गोयल मॅडम यांच्या महिमेनुसार वृक्ष लागवड करण्यासाठी अनुदान उपलब्ध असून, जास्तीत जास्त प्रमाणात फळझाडे लावण्या बाबत आव्हान केले.
श्री सुदामराव घुगे यांनी पिकाच्या वेगवेगळ्या जातीची निवड, जातीची वैशिष्ट्य, लागवड अंतर, उत्पादन व फवारणी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले, प्रगतिशील शेतकरी श्री रामेश्वर घुगे यांनी शेतीत केलेले वेगवेगळे प्रयोग व अनुभव सांगितले तसेच उत्पादन खर्चात बचत कशी करावी याबाबत माहिती दिली… यावेळी गावातील पवन जाधव, राजू जाधव ,भगवान जाधव, सुभाष मुंढे, कनिराम पवार, पंढरी जाधव, वामन पवार, सौ माया जीवन जाधव तसेच गावातील महिला व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर कार्यक्रम पार पडण्यासाठी सेवा निवृत्त केंद्र प्रमुख कंकर जाधव सर, मुख्याध्यापक स्वामी सर यांनी प्रयत्न केले. सूत्र संचालन कृषी सहाय्यक श्री जी. टी. राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी किशोर शेळके यांनी मानले.. कृषी विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.