राजेंद्र पाटील राऊत
ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे धुळ खात बसला आहे गावचा विकास
तहसील कार्यालयात निवेदन
युवा मराठा न्यूज,वेब नेटवर्क रवींद्र शिरस्कार,संग्रामपूर
संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीबहुल भागातील सायखेड ग्रामपंचायतचा भोंगळ कारभारामुळे गावातील विकास धुळ खात बसला आहे त्यामुळे गावात अनेक समस्या वाढ होताना दिसत आहे.
सायखेड ग्रामपंचायत मध्ये सरपंच व सदस्यांचा कार्यकाल संपला आहे तद्वत प्रशासक नियुक्ती करण्यात आलेली आहे यामध्ये प्रशासक ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे गावाचा विकासासाठी अडथळा निर्माण झाला आहे. गावकऱ्याची गैरसोय होत असुन त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
सायखेड ग्रामपंचायत जणू ठेकेदार चालवत असल्याचे भासवत आहे
. ग्रामपंचायतीत आलेल्या निधीची कल्पना देवच जाणे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे करिता दिनांक 28 जून रोजी तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले . यामध्ये संपूर्ण ग्रामपंचायतचा पाळा देण्यात आला तसेच यामध्ये अनेक समस्या मार्गी लागाव्या या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंगळी बु. येथील कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये गावाचे रस्ते नाल्या व सौंदर्यकरण व ग्रामसेवक चा ढेपाळलेला कारभाराची व मनमानी कारभार करत असलेली प्रशासक यांची सखोल चौकशी करण्यात यावी असे नमुद केलेले आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष अरुण निंबोळकार,तालुका सचिव श्रीकांत झाल्टे, रमजान भारसाकडे ,महिंद्रा भास्कर, जिल्हा सहसचिव श्यामभाऊ बोरपी, प्रदीप झाल्टे व अनेक कार्यकर्ते हजर होते