राजेंद्र पाटील राऊत
साखरीआगरमधील खलाशी बेपत्ता
जयगडमधील मच्छिमार नौका नवेद २ चा शोध सुरू
युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I ३१ ऑक्टोबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे
जयगड बंदरातून दिनांक २६.१०.२०२१ रोजी सकाळी ५ वा. मासेमारी करण्याकरीता गेलेली नवेद -२ नावाची बोट अद्याप जयगडला परतलेली नाही. या बोटीवर गुहागर तालुक्यातील सहा खलाशी आहेत. ३० आँक्टोबरला रात्री असगोली परिसरात खोल समुद्रात एक मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटलेली नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. यासाठी आज ३१ ऑक्टोबरला तटरक्षक दलामार्फत समुद्रात शोध मोहीम राबविण्यात येणार आहे