राजेंद्र पाटील राऊत
🛑 हनुमान नगर” राऊतवाडी” येथे “अग्नितांडव” 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
कोथरूड :⭕स्थानिक नगरसेवक मा. “दिपकभाऊ मानकर” यांचे स्वीय सहाय्यक मा. “दिलीपकाका कानडे” यांच्या व “दिवा प्रतिष्ठाचे” कार्यकर्ते व स्थानिक महिला, गणेश मंडळांच्या कार्यकर्ते व शेजारील लोकांच्या मदतीने आग विजविण्यात यश आले.
अन्यथा खूप मोठी हानी झाली असती, याची कल्पना देखील आपण करू शकत नाही.
शनिवार दिनांक २०.०३.२१ रोजी, सकाळी आपल्या सर्वे नंबर ४४ राऊतवाडी भागातील राहणारे श्री. “तुकाराम क्षीरसागर” हे सायकल वरून घरोघरी जाऊन भाजी विकण्याचा व्यवसाय करतात आज अचानक वरच्या घरात आग लागली, व धूर येऊ लागला त्यामुळे शेजारील लोक सतर्क झाले व काही मंडळींनी मा. “दिपकभाऊ मानकर” यांच्या ऑफिस मध्ये संपर्क केला, व घराला खूप मोठया प्रमाणात आग लागली आहे, ताबडतोब मदत यंत्रणा पाठवावी असे सांगितले.
सकाळची वेळ होती, क्षणाचा ही विलंब न करता मा.”दिलीपकाका कानडे” यांनी “विधुत विभाग “पोलीस यंत्रणा” व “अग्निशामक दल” यांना फोन करून तातडीने घटनास्थळी जाण्यास सांगितले, पण त्यांना हे माहीत होते की संपूर्ण भाग हा वस्ती चा भाग असल्याने “अग्नीशामक दलाची” गाडी लगेच पोचू शकत नाही, म्हणून त्यांनी लगेच जवळच राहणाऱ्या “दिवा प्रतिष्ठान” चे कार्यकते व “दिपकभाऊ मानकर” मित्र परिवारातील सदस्यांना तातडीने फोन करून झालेल्या दुर्घटनेची माहिती देऊन तातडीने मदत करण्यास सांगितले, व त्याच प्रमाणे सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक महिला व लोकांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण आणत असताना शेजारील सर्व लोकांचे सर्व पाणी साठविण्यासाठी भरलेल्या टिपाडातील पाणी बादलीने रिकामे करून आग विजविण्यात यश आले, व परमेश्वराच्या कृपेने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, परंतु क्षिरसागर यांचे घर आगीत खाक झाले, घरातील सर्व वस्तू आगीत जळून खाक झाल्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रीज, कपाट, कपडे दारे खिडक्या आगीत जळून गेल्या, अग्नीशामक दलातील अधिकारी व पोलीस यंत्रणा वेळेवर पोहचली, परंतु अग्निशामकदल गाडी पोहोचु शकली नाही कारण वस्थी भागातील आतमधील रस्ते छोटे, असल्या कारणाने त्या ठिकाणी मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही, यासाठी काहीतरी उपाय योजना भविष्यात करणे गरजेचे आहे, “स्थानिक महिला” व “पुनाराम चौधरी”, “राम वाशिवले”, “धोंडु बोडेकर”, “सागर पासलकर”, “विठ्ठल मारणे”, “सुशिल भोसले”, “हनुमंत मरगळे”, “महेश चाकणकर”, “गणेश चाकणकर”, “अनिकेत खळदकर”, “वैभव खोचडे”, “सुनील वडवेराव”, “दत्ता गायकवाड”, “अरुण भिलारे”, “शाम कोंढरे” ,”भूषण शिर्के”, यांनी मदत केली म्हणून आग आजूबाजूला पसरली नाही.⭕