कुंथत कुंथत सरकार चालत
नाही ”
प्रश्नांची कमतरता नाही निर्णयाची कमतरता आहे ; राज ठाकरेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
विशेष प्रतनिधी – राजेश एन भांगे
मुंबई,दि. २९ – महाराष्ट्र राज्या तील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलांचा जो शॉक सरकारने दिला आहे त्या विरोधात जनक्षोभ उसळून देखील सरकार पाऊलं उचलत नाहीये. तसंच शेतकऱ्यांना मिळणारा दुधाचा भाव हा न्याय्य असायला हवा ह्या मागणी कडे पण सरकारने तात्काळ लक्ष द्यायला हवं होतं पण ते होताना दिसत नाहीये. म्हणूनच राज्यपाल भगतसिंग कुशारी यांनी ह्या दोनी विषयांत लक्ष घालण्याचे सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महोदयांना केली आहे.
कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, राज ठाकरेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
राज्यात प्रश्न खूप आहेत. प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णया घेण्याची असं सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील ठाकरे सरकार वर टीका केली.