Home Breaking News   *जिवलग मित्राचा अनैतिक संबधातून खूण*

  *जिवलग मित्राचा अनैतिक संबधातून खूण*

209

*जिवलग मित्राचा अनैतिक संबधातून खूण*

*युवा मराठा न्यूज*

वाळवा तालुक्यातील घटना :
आपल्या जिवलग दोस्ताचा पाठलाग करुन धारधार शस्त्राने वार करून  निर्घृण खून केल्याची घटना आज वाघवाडी – पेठ दरम्यान असणाऱ्या मधल्या रस्त्यावर दुपारी घडली आहे.
या घटनेत अभिजित हरी शेलार ( वय वर्ष २२ ) मूळ गाव पेठ,ता.वाळवा सध्या राहणार जांभळवाडी याचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र  मारुती बांदल (वय वर्ष२५)  रा जांबळवाडी असे आरोपीचे नाव आहे.
मयत अभिजीत शेलार आणि संशयित आरोपी राजेंद्र बांदल हे दोघे जिवलग मित्र होते. परंतु आज हे मित्रच एकमेकांच्या जीवावर उठले. आज बुधवार दुपारी राजेंद्र बांदल यांने अभिजित शेलार वाघवाडी रोडवर पाठलाग करून एका शेतात त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. अभिजित याच्या अंगावर जवळ जवळ दहा जबरी वार होते व शेवटी गळा चिरून त्याचा शेवट केला. घटना स्थळावर बघ्यांची खुपगर्दी जमली होती. मयत अभिजित याचे मूळ गाव पेठ ता.वाळवा असून तो मामाकडे जांभळंवाडी येथे राहात होता .राजेंद्र व अभिजित जिवलग दोस्त होते. मात्र एका अनैतिक संबंधाच्या रागातून ही घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी होती.
खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलिसात हजर झाला आहे. घटना स्थळास पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी भेट दिली. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला असून  मयत अभिजित ची आई सुवर्णा शेलार यांनी फिर्याद दिली आहे . इस्लामपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

*कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*

Previous article*आपला पोशिंदा संकटात आहे. तो जगला पाहिजे,* *खा.छत्रपती संभाजीराजे*
Next article*आता अवघ्या ३ते४ रुपयांला मिळणार मास्क,* *ठाकरे सरकारचा निर्णय*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.