Home Breaking News नांदेड जिल्ह्याचे खा. चिखलीकर यांची केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवर निवड

नांदेड जिल्ह्याचे खा. चिखलीकर यांची केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवर निवड

162

नांदेड जिल्ह्याचे खा. चिखलीकर यांची केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवर निवड

नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समिती वर निवड करण्यात आली. यापूर्वी खा. चिखलीकर यांची केंद्रीय मंत्रालयाच्या विविध चार समित्यांवर निवड करण्यात आली आहे.
खा.चिखलीकर यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खालील केंद्र सरकारने चौथ्यांदा मोठी जबाबदारी सोपविली आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात सर्वात जास्त चर्चेत राहिलेले खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची लोकप्रियता आणि त्यांच्या धाडसी नेतृत्वा बद्दल केंद्रीय मंत्री मंडळातही त्यांच्या बद्दल दांडगी प्रतिष्ठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खालील केंद्र सरकार मधील अत्यंत महत्वाच्या अशा समित्यांवर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची यापूर्वीही निवड करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाच्या अशा समित्यांवर खासदार चिखलीकर यांची निवड करण्यात आली असल्याचे पण समजते.
यात रसायन व उर्वरक संसदीय स्थायी समिती, इस्पात मंत्रालयाच्या परमार्शदात्रि समिती आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॕस मंत्रालयाच्या समित्यांवरती खासदार चिखलीकर यांची निवड करण्यात आलेली आहे. आता विशेष बाब म्हणून देशातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवरही खासदार चिखलीकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे खा. चिखलीकर यांच्यावर आता केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री संतोषकूमार गंगवार हे असून या समितीत केंद्रीय मंत्री अर्जूनराम मेघवाल व व्ही मूरलीधरन यांचा समावेश असून या महत्त्वाच्या समितीवर खा.प्रतापराव पाटील यांची नियूक्ती झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous articleराज्य मंत्रिमंडळ बैठकीतअनेक महत्वाचे निर्णय; मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्याच्या नातेवाईकाना नोकरी मिळणार
Next article🛑 अखेर MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.