आशाताई बच्छाव
जालना जिल्हा ओला दुष्काळ घोषित करावा जिल्ह्यात पावसाचा कहर नद्यांना महापूर
जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक २७/०९/२०२५ रोज शनिवार या दिवशी चार वाजेपासून पावसाला सुरुवात झाली अती मुसळधार पावसामुळे जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये तसेच सर्वच नद्यांना महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यामुळे नदीकाठील गावातील शेतीचे फार मोठे नुकसान झालेले आहे. तरी या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तहसील कार्यालयाने तात्काळ शेतकऱ्यापर्यंत मदत कशी पोहोचेल याची काळजी घ्यावी अशी विनंती शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच संपूर्ण जालना जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा माल मातीमोल झालेला आहे त्यामध्ये सोयाबीन, मका, कपाशी, मिर्ची तसेच इतर पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण जालना जिल्हा ओला दुष्काळ म्हणुन घोषित करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.






