आशाताई बच्छाव
पातुर्डा बु येथे “मन की बात” व “स्वदेशी अभियान” उत्साहात
✍🏻स्वप्निल देशमुख
पातुर्डा बु (ता. संग्रामपूर) :
भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुथ क्रमांक 227 व 229 मिळून दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” या लाईव्ह कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले.
सायंकाळी “प्रत्येक घरी स्वदेशी – घरोघरी स्वदेशी” या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी “आत्मनिर्भर भारत” या पक्षाच्या धोरणाचा पुनरुच्चार करत, गावकऱ्यांकडून स्वदेशी संकल्प पत्र भरून घेण्याची सुरुवात झाली. स्वदेशी वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचा संकल्प करण्यात आला. गावातील दुकानदारांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान परिसरातील महिलांची लाडकी बहीण योजना व आयुष्मान भारत कार्ड यांची मोफत केवायसी करण्यात आली. तसेच मतदार यादीतील दुरुस्त्या व नवमतदार नोंदणीही करण्यात आली. या सर्व उपक्रमांना गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास भाजपा ज्येष्ठ नेते माजी सरपंच उत्तमराव तायडे, ज्येष्ठ नेते रमणजी सेवक, तालुका चिटणीस ज्ञानेश्वर तायडे, युवा नेतृत्व शुभम म्हसाळ, युवा पत्रकार आकाश पालीवाल, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुमनबाई तायडे तसेच प्रतिष्ठीत नागरिक रामेश्वर वानखडे, रमेश धर्माळ यांच्यासह कारसेवक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या वेळी मोहन तायडे, मनोहर तायडे, सारंगधर तायडे, संजय चांडक, भानुदास तायडे, गजानन तायडे, सुनील तायडे, संतोष तायडे, विश्वंभर तायडे, अरविंद तायडे, आशिष तायडे, पवन भारत तायडे, आदित्य तायडे, निलेश तायडे, गजानन राजनकर, संजय राहाटे, रामेश्वर निमकर्डे, प्रकाश बोंबटकार, पंकज निमकर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.






