आशाताई बच्छाव
धुळे नंदुरबार संदीप पाटील ब्युरो चीफ- अखेर जलजीवन मिशन योजना टिटाणे तालुका साक्री जिल्हा धुळे. येथील बहु चर्चेत असलेली ही योजना आज रोजी दिनांक सहा जून अखेर चौकशीला सुरुवात करण्यात आली पंचायत समिती साक्री यांना वेळोवेळी निवेदने आणि प्रत्यक्ष भेटून साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनवणे. तसेच उपअभियंता पवार साहेब यांना या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती देऊनही कुठल्याही प्रकारची चौकशी अथवा कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती मात्र या योजनेसंदर्भात ग्रामपंचायतीचे नेते सुभाष माळचे. तसेच युवा मराठा न्यूज चे प्रतिनिधी संदीप पाटील. यांनी या या योजनेसंदर्भात गावाची पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे म्हणून हा विषय गांभीर्याने घेऊन जलदूत प्रमाणे या विषयाचा माथेरान पाठपुरावा करून धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ नरवडे साहेब. व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता साळवे मॅडम यांच्याकडे पाठपुरावा करून या गंभीर विषयाची दखल घेऊन आमच्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. अशी विनंती . संबंधित तक्रारदार यांनी. जिल्हा परिषदेत केली. या संपूर्ण प्रकरणाची दखल सीईओ साहेबांनी घेतली व संबंधित विभागाला चौकशीचे आदेश दिले. संबंधित तक्रारदार यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे मागणी केली की साक्री पंचायत समितीचे कुठल्याही इंजिनिअर अथवा अधिकाऱ्यांना या चौकशी समितीत घेऊ नये कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धुळे यांनी तक्रारदार यांची मागणी मान्य करत. शिंदखेडा पंचायत समितीचे उपअभियंता सोनवणे तसेच जी ई इंजिनिअर चौधरी तसेच साक्री पंचायत समितीचे काही कर्मचारी . यांच्या माध्यमातून संपूर्ण कामाची चौकशी करण्यात आली. शिंदखेडा पंचायत समितीचे उपअभियंता सोनवणे. यांनी संबंधित तक्रारदार यांना सांगितले. की चौकशी अहवाल. कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे पाठवून तुम्हाला पुढील कारवाई काही दिवसात कळवू असे त्यांनी सांगितले. यामुळे संबंधित तक्रारदार यांना आशा आहे की गावाला शुद्ध पिण्याचे पाणी लवकरच मिळेल.. जोपर्यंत या योजनेचे शुद्ध पिण्याचे पाणी गावाला मिळत नाही तोपर्यंत संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरूच राहील. कारण ही योजना गावासाठी अत्यंत महत्त्वाची असून काही गावातील ठराविक बगलबच्च्यांनी या योजनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी माहिती तक्रारदार यांना मिळालेली आहे तो कदापी होऊ देणार नाही असेही तक्रारदार यांनी सांगितले. गावासाठी आलेल्या प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहोचतील व गावाचा विकास होईल या हेतूनेच संघर्ष करत आहोत असे तक्रारदार यांनी सांगितले.