Home जालना भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन

भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन

19
0

आशाताई बच्छाव

1001510850.jpg

 

भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन

सर्व देशप्रेमी नागरिकांनी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे यांचे आवाहन

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) : – ऑपरेशन सिंदूर राबविणाऱ्या भारतीय सैन्य दलाला समर्थन देण्यासाठी देशाच्या सीमांवर भारतीय सैनिकांनी दाखवलेला पराक्रम, त्याग व शौर्य यांचा सन्मान व मनोधैर्य वाढविण्यासाठी दिनांक १८ मे २०२५ रोजी सकाळी 9.00 वाजता भव्य तिरंगा रॅली पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

हि तिरंगा पदयात्रा जनार्धन मामा चौक जालना येथून सुरु होऊन स्वातंत्र्यवीर सावरकर चौक-टांगा स्‍टैन्‍ड्‌ ते बडी सडक येथील श्री राम मंदिराजवळ समारोप होणार आहे. यावेळी भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे, जालना ग्रा.जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, आ.संतोष पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जालना महानगर जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांवर आणि बहिणी-मुलींवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक कठोर निर्णय घेतला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आणि आमच्या सैन्याने पाकव्याप्त प्रदेशातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला आणि त्यांना पूर्णपणे नष्ट केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतीय सशस्त्र दलांच्या धैर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी ‘तिरंगा यात्रा’ आयोजित केली आहे.

सदरील भव्य तिरंगा रॅली पदयात्रेस सर्व देशप्रेमी, नागरिकांनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleनांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी.   
Next article21 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here