आशाताई बच्छाव
निरंकारी भक्तगणांकडून समर्पण दिवसानिमित्त
बाबा हरदेवसिंहजी यांना श्रद्धा सुमने अर्पित
समर्पण फक्त शब्दांपुरते सीमित न राहता ते प्रत्येक कृतीतून दिसावे
– सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ : संत निरंकारी मिशनच्या वतीने समर्पण दिवसाचे औचित्य साधून युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ एक भावपूर्ण वर्चुअल संत समागम आयोजित करण्यात आला. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या पावन उपस्थितीत 13 मे रोजी आयोजित केलेल्या या समागमात देशविदेशातून लाखो श्रद्धाळूंनी ऑनलाइन सहभाग घेतला.
समर्पण दिवसाच्या निमित्ताने निरंकारी भवन गांधी चमन जुना , जालना येथे विशेष सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये शेकडो भाविक भक्तगणांनी भाग घेतला आणि बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे दिव्य जीवन व शिकवणूकीतून प्रेरणा प्राप्त केली.
या दिवशी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी वर्चुअल सत्संगाद्वारे श्रद्धाळू भक्तगणांना संबोधित करताना सांगितले की सतगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे जीवन क्षणोक्षणी प्रेम, त्याग, सेवा आणि दिव्य शिकवणूकींनी परिपूर्ण होते. असेच भक्तिभावाचे समर्पित जीवन आपलेही व्हावे, असे त्यांनी प्रतिपादन केले. समर्पण फक्त शब्दांत न राहता ते आचरणात उतरायला हवे.
सतगुरु मातांनी स्पष्ट केले की खरी श्रद्धा आणि प्रेम हे केवळ बोलण्यातून नाही, तर कृतीतून व्यक्त होतात. जर आपण बाबाजींची शिकवण फक्त सोशल मिडियापुरतीच मर्यादित ठेवत असू, तर ते खरे समर्पण नाही. खरे समर्पण तेव्हाच प्रकट होते जेव्हा आपण आत्मपरीक्षण करून पहावे, की आपण खरोखरच नम्रता, क्षमा आणि प्रेम यांचे पालन करत आहोत का? त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू साध-संगतसाठी मार्गदर्शक होता. समर्पण दिवस ही केवळ एक तारीख नसून, ही एक संधी आहे.






