Home उतर महाराष्ट्र टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित तिसरे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य...

टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित तिसरे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रविवार दि. 23 मार्च रोजी मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न

83
0

आशाताई बच्छाव

1001380076.jpg

टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित तिसरे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रविवार दि. 23 मार्च रोजी मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न                                 श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी 

साहित्य संमेलनात साहित्य व मराठी भाषेच्या सेवेतील सर्व दिग्गज मान्यवरांची उपस्थिती सर्वांना भारावून गेली तसेच संमेलनाध्यक्ष सन्माननीय प्रा डॉ. केशवराव देशमुख यांच्या अभ्यासू, विचारशील, चिंतनशील, मराठी भाषेची अस्मिता व गौरव बद्दलच्या अध्यक्षीय भाषणाने संमेलनाला एक वेगळी उंची प्राप्त झाली. व या संमेलनासाठी आयोजकांनी घेतलेल्या प्रामाणिक कष्ट व मेहनत याचे चीज झाले. व संमेलन सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले संमेलनाच्या आयोजनांमधून भाषेचे सौंदर्य खुलते व भाषेची प्रतिष्ठा वाढते असे प्रतिपादन शासनाच्या भाषा समितीचे सदस्य सुप्रसिद्ध लेखक व कवी प्रा. डॉ. केशवराव देशमुख यांनी संमेलन प्रसंगी केले. यावेळी ते ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभानच्या वतीने आयोजित तिसरे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन कार्यक्रम प्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना देशमुख बोलताना म्हणाले की मराठी भाषा आपल्या जिभेवरील भाषा असून आपली देहबोली ,प्रसंग या भाषेतून सहज प्रकटतो अशी आपली सहज सुंदर वापरता येणारी मराठी मातृभाषा आहे. मराठी भाषा अभिजात आहेच शासनाने अधिकृत अभिजात मराठी भाषेचा दर्जा देऊन या भाषेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सध्या प्रत्येक शासकीय कार्यालयांना मराठी भाषेतून माहिती देणे, कामकाज करणे शासनाने अनिवार्य केले आहे. साहित्य संमेलना मधून या भाषेचा प्रचार प्रसार होऊन तिची थोरवी व गोडवी गायली जाते. इतर भाषांचे आपल्यावर जास्त अतिक्रमण होत आहे, सध्या मोबाईल युगामध्ये संवाद हरवत चालला असून आपल्या भावना व विचार व्यक्त करण्यासाठी संमेलनाशिवाय पर्याय नसल्याचे प्रा. देशमुख म्हणाले.
आ. हेमंत ओगले बोलताना म्हणाले की साहित्य, शिक्षण आणि सेवाकार्य पुरस्कार वितरण ही सेवासंस्कृती आहे.मी अशा साहित्य संमेलनात प्रथमच प्रमुख पाहुणा म्हणून बोलत असून मराठी भाषा, साहित्यिक, शिक्षक, समाजातील गुणवान मान्यवरांची दखल घेणारे अर्जुन राऊत यांची ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था साहित्यक्षेत्रात भूषणावह असल्याचे मत श्रीरामपूर विधान परिषदेचे आ. हेमंत ओगले यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील विठ्ठल-रुक्मिणी माधव मंगल कार्यालयात ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेतर्फे तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आणि राज्यस्तरीय उत्कृष्ठ मराठी अध्यापन व साहित्यसेवा कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आ. ओगले बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन नाशिक येथील कविवर्य कुसुमाग्रज यांच्या मानसकन्या आणि ज्येष्ठ लेखिका रेखाताई भांडारे यांनी केले. दीपप्रज्वलन आणि श्रीसरस्वती प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील राज्य शासन भाषा समिती व मराठी विद्यापीठ स्थापना समिती सदस्य सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ आणि समीक्षक डॉ. केशव सखाराम देशमुख, श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे उपस्थित होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ ग्रामीण कवी पोपटराव पटारे यांनी सर्वांचे स्वागत केले संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष,संयोजक अर्जुन राऊत यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, सावित्रीबाई फुले मराठी अभ्यास मंडळाचे समीक्षक प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, धुळे येथील जल अभ्यासक भिला सोनू पाटील, महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, संगमनेर येथील रोटरी क्लब व पर्यावरण संचालक सुनील माधवराव घुले, निसर्ग व सामाजिक पर्यावरणप्रदुषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. संतोष परदेशी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी संमेलनातून आपले विचार मांडून शुभेच्छा दिल्या. सिन्नर येथील ज्येष्ठ कवयित्री व लेखिका सुनीताताई वाळुंज यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी सुप्रसिद्ध कवी व गायक रामप्रसाद उंबरे (बीड )याने उपस्थित यांचे बहारदार सुमधुर गायनाने मन जिंकले नेवासा येथील संत ज्ञानेश्वर संस्थानचे खजिनदार विश्वस्त ज्ञानेश्वरमाऊली शिंदे यांनी शुभचिंतन व्यक्त केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या’ साहित्याचे दीपस्तंभ’ या पुस्तकाचे प्रकाशन आ. हेमंत ओगले आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. डॉ. उपाध्ये यांनी अभिजात मराठी भाषेचे महत्व सांगितले.छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी ह.भ.प. दत्तात्राय बहिरट महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे मा.सदस्य राजाराम सोनटक्के, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य सचिव प्रा. डॉ.अनिल लोखंडे सर, मराठी बालभारती पुणे मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील आदी उपस्थित होते. बापुसाहेब तनपुरे, सुरेखा घोलप, कवयित्री संगीता फासाटे, वर्षा भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार प्रकाश कुलथे यांनी आभार मानले. पसायदानाने संमेलनाची सांगता झाली. कार्यक्रम प्रसंगी साहित्यिक ,कवी, व अनेक मान्यवर यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या व आपली अनमोल उपस्थिती दर्शविली… यामध्ये श्रीरामपूर पंचायत समितीचे मा. सभापती नानासाहेब पवार, टाकळीभानचे मा. उपसरपंच राजेंद्र कोकणे, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पटारे, विलास दाभाडे, संत सावता सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब तनपुरे, ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीधर गाडे,सोमनाथ पाबळे, बंडोपंत बोडखे, जितेंद्र छल्लारे, अमोल पटारे,दगडू गायकवाड, नवनाथ पवार, साहित्य प्रेमी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, उपाध्यक्ष संदीप पटारे, भैया पठाण, अक्षय कोकणे, सुदाम पटारे, सुजित बोडखे, रवींद्र पटारे, गोराणे सर,सतीश गायकवाड, मनोज मगर आदी सह मंडळाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले. व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here