Home भंडारा मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या घरी सांत्वन भेट

मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या घरी सांत्वन भेट

143

आशाताई बच्छाव

1001150468.jpg

मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या घरी सांत्वन भेट

मिराबाई फाल्गुनराव पटोले यांच्या प्रतिमेला अभिवादन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांच्या मातोश्री स्व. मीराबाई फाल्गुनराव पटोले यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमानिमित्त स्वगाव सुकळी/महालगाव येथे ( शुक्र. १० जाने.) ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आ. नाना पटोले यांच्या घरी सांत्वना भेट दिली व चर्चा केली.
सुकळी येथे आ. पटोले निवासस्थानी गाड्यांचा ताफा पोहचताच सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री स्व. मिराबाई फाल्गुनराव पटोले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. पाऊण तास मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष पटोले आणि कुटूंबीयांसह दिर्घ चर्चा केली. नंतर मुख्यमंत्री फडणवीस हे सुकळी येथून दुसऱ्या ठिकाणी रवाना झालेत. यादरम्यान जिल्हा पोलीस यंत्रणा, बॉम्ब शोधक व नाशक पथक नागपूर, साकोली पोलीस चमु आणि वाहतूक पोलीसांनी भंडारा – साकोली – न्यायालय गोवर्धन चौक – सावरबंद वडद रोड आणि सुकळी महालगाव पर्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता. आ. नाना पटोले यांच्या निवासस्थानी मातोश्री स्व. मिराबाई फाल्गुनराव पटोले यांना श्रद्धांजली देण्यासाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, खासदार, आमदार आणि जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सुकळी महालगाव येथे हजेरी लावली होती.

Previous articleपत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
Next articleखरंच “दारू” ही माणसाला अखेर काय करवून सोडते – अनामिक बांधव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.