Home बुलढाणा सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर कठोर कारवाई करा

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर कठोर कारवाई करा

174

आशाताई बच्छाव

1001076699.jpg

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर कठोर कारवाई करा
सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी -स्वप्निल देशमुख
संग्रामपूर :- बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात -कठोर शासन करावे. सखोल तपास करून सर्व गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी मराठा समाज संग्रामपूर तालुका च्या वतीने तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही समस्त मानव जातीसाठी व महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजविणारी गोष्ट आहे. समाज माध्यमावरून व्हायरल झालेल्या संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो पाहून अंतकरण पिळवटून निघत आहे. एखाद्या रानटी हिंसक श्वापदांनी मिळून एखाद्या पक्षाला ठार मारावे अशा प्रकारे झालेली ही निर्गुण हत्या मानव जातीला न शोभणारी असून मानव जातीला काळीमा फासणारी निश्चितपणे आहे .अशा प्रकारे झालेली ही निर्घुण हत्या जनसामान्यांच्या भावना संतप्त करणारी आहे. ‘हम करे सो कायदा’ याप्रमाणे या नराधमांनी न्यायालयातून जामीन मिळाल्याच्या दोनच दिवसानंतर केलेले कृत्य हे केवळ कायद्याची भीती न उतरल्याचे प्रतीक आहे. नराधमांनी केलेल्या कृत्याची स्वतंत्र तपास यंत्रणेद्वारे तपास करून विद्वान वकील नेमावेत हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे, तसेच या प्रकरणांमध्ये दोशी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरही निलंबनासह त्यांच्यावर टर्मिनेट ची कारवाई करावी कारण या घटनेमध्ये पोलिसांनी सपशेल गुन्हेगारांना मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यामध्ये दोषी पोलिसांना सहआरोपी करावे अशी मागणी संग्रामपुर तालुका मराठा समाज यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी स्वप्निल देशमुख ,
ज्ञानेश्वर पाटील ,अमोल ठाकरे अभयसिंग मारोडे ,पुंडलीक खानइाोड डाँ विवेक देशमुख ,
राहुल मेटांगे ,अजय घिवे
ओमप्रकाश देशमुख ,अनुप देशमुख
विवेक राऊत ,शिवशंकर अढाव
शाम देशमुख संग्रामपूर तालुक्यातील
मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमस्साजोग संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची बैठक
Next articleमाझ्या प्रभूंच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.