आशाताई बच्छाव
बीडच्या पांढरवाडी गावात वीज पडून चार जनावरांचा मृत्यू ; तीन लाखाचे नुकसान
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड – जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा खूपच जोरदार असून काल दिवसभर तापमान जवळपास ४२ डिग्री सेल्सिअस गेल्यामुळे हवेमध्ये उष्णतेची लाट पसरली होती. यामध्ये दुपारी पाच नंतर अचानक विजांचा कडकडाट आणि गडगडात पाहायला मिळाला. यातच बीडच्या पांढरवाडी गावात वीज पडल्याने चार जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास ०३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतामध्ये बांधलेली जनावरे ती गोठ्यात बांधायची होती मात्र काही वेळातच अचानक वीज पडल्याने शेतकरी दिलीप उत्तम शेळके दोन बैल व दोन दुभत्या गाई या मरण पावले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यावर आर्थिक नुकसानीचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अवकाळी पावसाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनाही सहन करावा लागत आहे.