आशाताई बच्छाव
माहोरा येथे पाण्याची समस्या दूर होणार ? “अखेर टँकर झाले सुरू’
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
सविस्तर वृत्त असे की, माहोरा येथे पाणी टंचाईची खूप वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत गावकऱ्यांना पाणी टंचाई पासून दूर करण्यासाठी टँकर ने पाणी पुरवठा करणे हाच एकमेव पर्याय ग्रामपंचायत पुढे होता . सरपंच गजानन पाटील लहाने व ग्रामसेवक धुमाळ साहेब यांच्याकडे गावकऱ्यांच्या पाण्यासाठीच्या खूप तक्रारी होत्या की, आपल्याला माहोरा येथे पाण्याची समस्या दूर करण्यासाठी टँकर सुरू करून पाणी पुरवावे. त्यांची दखल घेऊन सरपंच गजानन पाटील लहाने आणि ग्रावसेवक धुमाळ साहेब यांनी शासन दरबारी प्रयत्न करुन पाण्याचे टँकर मंजुर करून घेतले. त्यामुळे गावातून सरपंच व ग्रामसेवक धुमाळ यांचे माहोरा येथील गावकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे. टँकर ने आणलेले पाणी अगोदर पाणी पुरवठा टाकी मध्ये टाकले जाते. त्यानंतर गावांमध्ये पाणी सोडले जाते. पाणी सोडत असतानां गावातील सर्व नागरिकांना व गावातील प्रत्येक वार्डात सर्वांना पाणी मिळेल अशी व्यवस्था सरपंच व ग्रामसेवक यांनी करावी अशी गावकऱ्यांची इच्छा असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांच्या वतीने आल्या आहेत.