Home सामाजिक कचरा

कचरा

335
0

आशाताई बच्छाव

IMG_20240305_065615.jpg

कचरा

रोजच्या दैनंदिन जीवनात आपण कितीतरी कचरा करत असतो.त्यात सर्वात जास्त भर पडते ती प्लॅस्टिकच्या कच-याची.प्लॅस्टिकचा शोध लागून शेकडो वर्षे झालीत.प्लॅस्टिक कधीही नष्ट होऊ शकत नाही.कचरा व्यवस्थापन करणे खरेतर खूप मोठे आव्हान आहे.माणूस रोजच्या जीवनात प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर करतो.हे प्लॅस्टिक अनेक प्रकारे आढळते.जसे प्लॅस्टिकच्या पिशव्या,चिप्सचे कवर, चाॅकलेटचे कवर इत्यादी.माणसे सर्रासपणे प्लॅस्टिक इकडे तिकडे फेकून देतात.मग हे प्लॅस्टिक नाल्या, नद्यांमध्ये, समुद्रात मोठ्या प्रमाणात जमा होते.कधीकधी तर मुकी जनावरे प्लॅस्टिकच्या पिशवीत फेकलेले पदार्थ खाताना त्यांच्या पोटात प्लॅस्टिक जाते आणि त्यांना मोठी हानी होऊ शकते.सध्यातरी प्लॅस्टिकला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी कुठलाच उपाय नाही.
जसजशी लोकसंख्या वाढते आहे,तसतशी कच-याची निर्मितीही वाढते आहे.कच-याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे अनेक रोगराई पसरण्याची शक्यता असते.कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी काही पध्दतींचा वापर केला जातो.जसे..रिसायकलिंग,कंपोस्टिंग इत्यादी.रोज हजारो टन कचरा निर्माण होत असतो.आता तर रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी कचरागाडी येत असते.त्यामुळे लोक कचरा कचरागाडीत टाकण्यास जागृत होत आहेत.पण सगळेच असं करत नाही.काही लोक आजही आपल्या आजूबाजूच्या परिसरात कचरा टाकतात.त्यामुळे कच-याला खूप दुर्गंधी सुटते आणि स्वास्थ्य खराब होण्याची शक्यता असते.कारखान्यांतूनही विषारी कचरा पाण्यात सोडल्या जातो.त्यामुळे पाण्यात राहणाऱ्या जलचर प्राण्यांना फार नुकसान होते.जलचर प्राण्यांचे सेवन केल्यामुळे मानवाला देखील धोका संभवतो.यासाठीच कच-याचे रिसायकलिंग करणे महत्त्वाचे ठरते.दुसरा उपाय म्हणजे लॅंडफिल्स.यात जमीनीत मोठा खड्डा करून त्यात कचरा भरल्या जातो आणि त्यावर मातीचा थर दिला जातो.हा कचरा वर्षानुवर्षे आतमध्ये कुजत राहतो.अश्याप्रकारे कच-याचे खतामध्ये रूपांतर होते ज्याला कंपोस्टिंग म्हटले जाते.यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही.हे तयार झालेले खत झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते.कच-याचे व्यवस्थापन करण्यामुळे वातावरण प्रदूषित होत नाही.त्यामुळे स्वच्छता राखली जाऊन सर्व लोकांना एक चांगले वातावरण मिळते.
कचरा व्यवस्थापनात कामगारांचा मोठा वाटा असतो.कामगार कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावत पर्यंत अनेक कामे करतात.त्यामुळे रोजगाराची संधीही निर्माण होते.कचरा व्यवस्थापनाची सुरूवात घरापासून व्हायला हवी.प्लॅस्टिक कच-याचा पुनर्वापर करावा.कचरा इकडेतिकडे न फेकता सुका आणि ओला कचरा वेगवेगळा गोळा करून तो कचरागाडीत टाकावा.कच-याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleगडचिरोली पोलीस भरतीत ई डब्ल्यू एस व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण देवून भरती प्रक्रिया राबवा.
Next articleनागरिकांनो सावधान…! मालेगावात साई सेलिब्रेशनमध्ये घुसला बिबट्या….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here