राजेंद्र पाटील राऊत
ऑनलाईन ओढ ऑफलाइन तिरस्कार
नाती तीच खरी असतात,
जी एकमेकांवर रुसतात, रागावतात,
भांडतात पण……!
साथ कधीच सोडत नाहीत.
ज्या व्यक्तीची आपण आतुरतेने वाट पाहत असतो की तो व्यक्ती आपल्याला एक फोन करेल एक मेसेज करेल .मोबाईल च्या रिंग कडे आपले कान आपले डोळे नजर ठेवून बसलेले असतात. मुळात तोच व्यक्ती दुसऱ्याशी सतत तास अन तास ऑनलाईन राहून बोलत असतो. दुसऱ्याशी बोलण्यासाठी वेळ काढत असतो पण आपल्याशी मात्र कारणे देऊन बहाणे सांगून तो व्यक्ती आपल्याशी बोलणे टाळत असतो .आपला तिरस्कार करत असतो अशावेळी समजून जायचं की त्या व्यक्तीला आता आपली गरज राहिलेली नाही. आपण त्या व्यक्तीला किती ही म्हणलो की माझ्याशी बोल तरी तो काही एक ऐकणार नाही .आणि सतत आपल्यावर रागावेल आपलीच चुकी काढून आपल्याशी भांडण करेल चिडचिड करेल. अशा वेळेस समजून जायचं की त्या व्यक्तीला आपली गरज राहिलेली नाही त्यामुळे आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यातून लवकर बाहेर पडायचं असतं .कारण त्या व्यक्ती ने कधीच तुमच्यावर मनापासून प्रेम केलेल नसत,मग अशा व्यक्ती पुढे किती ही डोकं आपटलं तरी दगडाच्या काळजाला त्याच काय…! वेदना मात्र आपल्याच होणार असतात. ज्याचा त्या व्यक्तीला काहीही फरक पडत नसतो आपण असलो काय आणि नसलो काय याच्याशी त्याला काही ही घेणं देणं नसतं. तो दुसऱ्यांशी मजेत बोलत असतो, संवाद साधत असतो आपण मात्र इकडे त्या व्यक्तीच्या आठवणीत झुरत असतो त्याची वाट पाहत असतो. म्हणून सत्य स्वीकारा आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातून लवकर बाहेर पडा .स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका ज्याला आपली काहीही किंमत नाहीये त्याच्या आयुष्यात थांबून तरी काय फायदा ..!
ज्या व्यक्ती बरोबर आपण नातं जपतो त्या व्यक्तीला आपण खरोखरच महत्वाचे आहोत का ? हे अजमावणे पण तेवढेच गरजेचे असते …!
याचा कोणाच्या वैयक्तिक जीवनाशी काहीही संबंध नाही.