आशाताई बच्छाव
येत्या लोकसभा व विधानसभा
निवडणूकीत बौद्ध समाजास
उमेदवारी न दिल्यास निवडणूकीवर बहिष्कार टाकणार .
– – – – – – – – – – – – – – – – – –
श्रीरामपूर ( प्रतिनिधी दिपक कदम)
येत्या लोकसभा व विधानसभा
निवडणूकीमध्ये बौद्ध समाजास
उमदेवारी न दिल्यास हा समाज
निवडणूकीवर बहिष्कार टाकणार असा ठराव श्रीरामपूर
येथे व्हि.आय.पी. गेस्ट हाऊस
मध्ये आयोजित बैठकीत घेण्यात आला. येत्या लोकसभा
व विधानसभा निवडणूकी संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक
नुकतीच संपन्न झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे
कार्याध्यक्ष डॉ. प्रवीणराजे साळवे हे होते.
सन २००९ पासून शिर्डी
लोकसभा व श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ अनुसूचित जाती साठी राखीव
आहे. परंतु गेल्या तीन पंचवार्षिक निवडणूकांमध्ये
प्रस्थापित पक्ष व नेते बौद्ध
समाजास उमेदवारी न देता
सातत्याने एका विशिष्ट समाजाच्या उमेदवारास उमेदवारी देवून बौद्ध समाजावर सातत्याने अन्याय
करीत आहे. या मागील अनेक
निवडणूकांमध्ये बौध्द मागास
वर्गीय व मुस्लीम समाज प्रामाणिकपणे
प्रस्थापित पक्ष व त्यांच्या नेत्यांना मतदान करून
निवडून आणतात परंतु गेली
अनेक वर्ष फुले शाहु आंबेडकर
चळवळीमध्ये तसेच विविध सामाजिक आंदोलनात व समाजकार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र
सातत्याने उमेदवारीपासून
डावलण्यात येत आहे.
तसे पाहता या राखीव मतदार
संघात बौद्ध मागासवर्गीय
समाजाची लोकसंख्या मोठ्या
प्रमाणात असताना सुद्धा
सातत्याने बौद्ध समाजास
लोकसभा व विधानसभा
उमेदवारी दिली जात नाही
त्यामुळे ह्या समाजात
संतापाची लाट पसरली आहे.
जर बौद्ध समाजास लोकसभा
विधानसभा निवडणूकीत प्रतिनिधित्व दिल्यास सर्व समाज आपले
सर्व गटतट विसरून समाजाच्या उमेदवाराच्या
पाठीशी तन मन धनाने खंबीरपणे उभा राहिल
असा निर्धार याप्रसंगी व्यक्त
करणात आला. याप्रसंगी
अनेक कार्यकर्त्यांनी आपले
अभ्यासू विचार मांडले.
या नंतर निवडणूकीची पुढील
रणनिती ठरविण्यासाठी लवकरच मोठ्या प्रमाणात
सामाजिक ऐक्य परिषदेचे
आयोजन केले जाणार असल्याचे या मेळाव्याचे निमंत्रक सुभाषदादा त्रिभुवन
व संदिप मगर यांनी सांगितले.
या बैठकीस राजाभाऊ कापसे ,
पी.एस.निकम, भिमाभाऊ
बागुल , अशोकराव दिवे ,
मिलिंदकुमार साळवे, कार्लस
साठे, रमेश मकासरे , रविंद्र
गायकवाड , रितेश एडके ,
सचिन ब्राम्हणे , दिपक कदम
डॉ.दिलीप शेजवळ , सुरेश
कांबळे, ॲड प्रमोद सगळगिळे
ॲड .एन.एम.येवले , राहुल पठारे, सचिन पंडित , आंबादास निकाळजे , फ्रान्सिस
शेळके , संजय शिरसाठ, प्रदिप
गायकवाड , सुनिल कसाब ,
पॉल बनकर, प्रशांत शिंदे ,
अशोक बारसे , मंगेश गायकवाड, गौतम डोंगरे , अर्जुन शेजवळ , अमोल काळे
योगेश बनसोडे , कार्तिक बारसे
रावसाहेब घोडे , सागर पारखे
विनायक नाऊस्कर आदी सह
विविध पक्ष , संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते .