आशाताई बच्छाव
चाळीसगाव महाविद्यालयाच्या वतीने नदी स्वच्छता मोहीम
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील-
चाळीसगाव महाविद्यालयाच्या वतीने डोंगरी आणि तितुर नदी किनाऱ्याची एनसीसी चे छात्र सैनिकानी स्वच्छता केली.
48 महाराष्ट्र बटालियन एनसीसी धुळ्याचे कर्नल शैलेंद्रकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाने डोंगरी आणि तितूर नदीपात्राच्या किनाऱ्याची एनसीसीच्या छात्र सैनिकांनी स्वच्छता अभियान राबवले या अभियानात बेबी गर्ल्स हायस्कूलच्या चाळीस एनसीसी छात्र सैनिक तसेच ए एस सी कॉलेज चाळीसगावचे 40 छात्र सैनिक यांनी सहभाग नोंदवला.
या विध्यार्थ्यांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अजय काटे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या शुभेच्छा पर भाषणात स्वच्छतेला जीवनात किती महत्त्व आहे हे पटवून दिले.
या कार्यक्रमासाठी मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायण अग्रवाल, व्हाईस चेअरमन योगेश अग्रवाल, सीनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन सुरेश स्वार यांनी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. राजेश चंदनशिव, ट्रेनिंग ऑफिसर अहिरे मॅडम ह्या उपस्थित होत्या.