आशाताई बच्छाव
बीड जिल्ह्यातील बस व इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड दि:२६ रोजी मराठा समाजाचे जनक मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवेली येथून मुंबईच्या दिशेने निघाल्यामुळे बीड जिल्ह्यातील आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात बस पेटवल्यानंतर बीड जिल्हाही सतर्क झाला आहे. याच अनुषंगाने बीड जिल्ह्यातील बस व इंटरनेट सेवा १० तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. तसेच बीड व जालना जिल्ह्याची बॉर्डरही सील करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलाकडून आता कठोर पावले उचलली जात असून सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरी बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर शहरात बस व इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.