Home भंडारा सडक अर्जुनी येथे अखिल भारतीय अपंग ध्रुवतारा क्रांतिकारी सामाजिक संघटनेची सभा संपन्न

सडक अर्जुनी येथे अखिल भारतीय अपंग ध्रुवतारा क्रांतिकारी सामाजिक संघटनेची सभा संपन्न

132

आशाताई बच्छाव

IMG_20240220_081840.jpg

सडक अर्जुनी येथे अखिल भारतीय अपंग ध्रुवतारा क्रांतिकारी सामाजिक संघटनेची सभा संपन्न

संजीव भांबोरे( गोंदिया) जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष भार्गव वाघमारे यांच्या नेतृत्वात सभा घेण्यात आली. यावेळी गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष गणेश राहुलकर, जिल्हा सचिव किशोर बडगाये ,उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण फुरसुंगी सडक अर्जुनी तालुका उपाध्यक्ष यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष भार्गव वाघमारे यांनी दिव्यांगांच्या स्वयंरोजगाबाबत माहिती दिली .त्याचप्रमाणे शैक्षणिक, औपचारिक ,स्वबळावर निर्भर कसे राहावे याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींनी अधिकाऱ्यांसोबत आपल्या अडीअडचणी पूर्ण करण्याकरता तत्पर असावे असे सुद्धा यावेळी त्यांनी सांगितले .यावेळी जिल्हा सचिव किशोर बलगाये ,जिल्हा उपाध्यक्ष गणेश राहुलकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले .आभार अशोक मेश्राम यांनी मानले. यावेळी स्वाती शिवणकर, अशोक मिश्रा जागेश्वर प्रत्येकी , प्रकाश हत्तीमारे ,रवींद्रविठ्ठले , निलेश शिवणकर हेमराज टेकाम, विकी धमगाये आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleचिखलपहेला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम संपन्न
Next articleजिल्हा परिषद प्रीमियर लीग ( सिझन १) डे नाईट क्रिकेट प्रतियोगिते चा शुभारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.