आशाताई बच्छाव
वंचित बहुजन आघाडी तर्फे पाच गावात संविधान सन्मान रॅलीला उत्तम प्रतिसाद
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )भारतीय संविधान जगातील लिखित सर्वात मोठे सर्वश्रेष्ठ असून काही संविधान विरोधी व्यक्ती संविधाना बदलविण्याची भाषा करत आहेत.
आपल्या संविधानाने सर्व समूहातील घटकांना अधिकार बहाल केले आहेत .
स्वातंत्र्य ,समता, बंधुता, व सामाजिक न्याय, यावर अवलंबून असून सर्व वंचीत घटकांना या भारतीय राज्य घटनेद्वारे त्यांची प्रगतीची दारे खुली झाली आहेत .जगात नंबर एक ची घटना असताना काही लोक घटना बदलण्याची भाषा करत आहेत.
भारतीय राज्यघटना कशी उत्तम आहे ? बहुजन समाजातील घटकांना कसे न्याय मिळवून देत आहे व प्रबोधन करण्याकरता वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा साकोली तर्फे 5 गावात सालई, बोलदे,वांगी, पळसगाव, महालगाव, इत्यादि गावात संविधान के सन्मान मे वंचीत बहुजन आघाडी मैदान मे हा उपक्रम घेऊन भंडारा जिल्हा प्रभारी भगवान भोंडे, भंडारा संघटक जिल्हा संघटक डी जी रंगारी, महीला जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे यांच्या नेतृत्त्वात रैली करण्यात आली व प्रत्येक ठिकाणी संविधान विसई प्रबोधन
भंडारा जिल्ह्यातील प्रभारी भगवान भोंडे ,जिल्हा संघटक डी जी रंगारी, जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे ,तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, तालुका संघटक प्रषिक मोटघरे, रेखा रामटेके यांनी रैली ला मार्गदर्शन करीत आहेत
पाचही गावात उत्तम प्रतिसाद मिळाला
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका अध्यक्ष रंगारी ,तालुका संघटक प्रक्षिक मोटघरे, रेखा रामटेके, त्रिवेणी मेश्राम, यांनी परिश्र घेतले
तसेच रैली चा समारोप महालगाव येथे करण्यात आले .प्रास्ताविक तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी ,
संचालन तालुका संघटक प्रशिक मोटघरे तर आभार रेखा रामटेके यांनी मानले.