आशाताई बच्छाव
महाराष्ट्रातील जनता भाजप आणि गद्दार नेत्यांना धारा देणार नाही: ऑड. यशोमती ठाकूर यांची भाजप सह अशोक चव्हाण यांच्यावर टीका.
————
दैनिक. युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री ऑड. यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ब्लॅकमेलिंग करून भाजपने फोडले आहे. मात्र भाजपने कितीही प्रयत्न केले, डबा टाकून नेत्यांना वाढण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता मात्र भाजपाने अशा गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चित थारा देणार नाही असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे. केंद्र सरकारने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या शोध पत्रिकेमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचे नाव आल्यानंतर त्यांनी दिलेला हा राजीनामा कशाचे लक्षण आहे हे स्पष्ट होते. अशोक चव्हाण यांच्यावर गेल्या काही महिन्यापासून सातत्याने दवा होता मात्र अखेरीस त्यांना अशा पद्धतीने ब्लॅक मेल करून राजीनामा द्यायला भाग पाडले आहे. स्वतःच्या पक्षाची ताकद आणि प्रतिमा दोन्ही उतरणीला लागल्यामुळे भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचे डाव खेळत आहेत काही समस्यांमध्ये अथवा प्रकरणांमध्ये अडकलेले काही आदर्श नेत्यांना भारतीय जनता पार्टी निश्चित आपल्याकडे दबाव टाकून ईडीसीबी आहे पक्षात घेऊ शकते. मात्र तमाम जनता जनार्दन नाही ही बाब निश्चित रुचणारी नाही. अत्यंत विकृत पद्धतीच्या या राजकारणाचा शेवट येत्या निवडणुकीत सुज्ञ मतदारांकडून निश्चित केला जाईल याची आम्हाला खात्री आहे अशी ही यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. विकृत राजकारणाला आणि गद्दारी युतींना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही. या संदर्भात यशोमती ठाकूर यांनी म्हटले की यापूर्वी मुघल सेना प्रचंड फौज फाटा आणि दारूगोळा घेऊन तिथल्या माळ्यावर चाल करून आली होती आम्हीच दाखवून आणि भीती दाखवून तिथल्या काही मनसे बगारांना आणि वतनदारांना मोघलांनी आपल्या बाजूने करून घेतले होते. देशासाठी स्वराज्यासाठी लढणाऱ्या, मातीशी इमान बाळगलेल्या, संख्येने कमी असलेल्या मावळ्यांचा विजय छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली झाला हे महाराष्ट्र विसरले नाही. आणि आगामी निवडणुकीत हे विसरणारे नाही. विकृत राजकारणाला आणि गद्दारी युतींना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही जनता थरा देणार नाही असे ऑड. यशोमती ठाकूर म्हणाल्या. कार्यकर्त्यांची दांडगा संपर्क हेच अशोक चव्हाण यांचे बलस्थान: पहा त्यांच्या कारकिर्दीची आलेख; काँग्रेस करता धक्काच का मानला जातोय?